• Download App
    10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांकडून घेतलेले परीक्षा शुल्क परत करणार महाराष्ट्र बोर्ड, जाणून घ्या प्रक्रिया । Maharashtra Board will refund the examination fees taken from 10th and 12th students, know what is the process

    10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांकडून घेतलेले परीक्षा शुल्क परत करणार महाराष्ट्र बोर्ड, जाणून घ्या प्रक्रिया

    महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळाने या वर्षी कोविड-19 महामारीमुळे रद्द झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षा आणि एचएससी परीक्षांसाठी आकारण्यात आलेल्या शुल्कापैकी 14-18 टक्के शुल्क परत करण्याचा निर्णय घेतला आहे. Maharashtra Board will refund the examination fees taken from 10th and 12th students, know what is the process


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळाने या वर्षी कोविड-19 महामारीमुळे रद्द झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षा आणि एचएससी परीक्षांसाठी आकारण्यात आलेल्या शुल्कापैकी 14-18 टक्के शुल्क परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

    शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    एसएससी आणि एचएससी 2021 च्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे तपशील अपलोड करण्याच्या सूचना महाराष्ट्र शिक्षण मंडळाने शाळांना दिल्या आहेत. परताव्याची रक्कम प्रत्येक शाळेच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. यानंतर विद्यार्थ्यांना ते शुल्क परत करण्याची जबाबदारी शाळेची असेल. बोर्डाच्या परीक्षेसाठी इयत्ता 10वीच्या 16 लाख आणि 12वीच्या 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.



    मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका

    महाराष्ट्र शिक्षण मंडळाने जुलै-ऑगस्टमध्ये अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर केले. सांगली जिल्ह्यातील मिरजेतील सेवानिवृत्त प्राचार्यांच्या परीक्षा शुल्काचा परतावा मागणाऱ्या जनहित याचिकांनंतर, मुंबई उच्च न्यायालयाने बोर्डाला याचिकेवर विचार करण्यास सांगितले होते. याचिकाकर्त्याने म्हटले होते की, बोर्डाने विद्यार्थ्यांकडून 150 कोटींहून अधिक रक्कम गोळा केली होती आणि परीक्षा रद्द झाल्यानंतर ती परत न केल्यास नफेखोरी ठरेल, असे म्हटले होते.

    किती रक्कम होणार परत?

    जमा झालेली रक्कम अंशत: परत करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने गुरुवारी घेतला. एसएससी परीक्षेसाठी 415 रुपये भरणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना 59 रुपये किंवा 14% परतावा मिळेल. 520 रुपये भरलेल्या 12वीच्या विद्यार्थ्यांना 94 रुपये (18%) परतावा मिळेल. ऑक्टोबरमध्ये पुरवणी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना परतावा मिळणार नाही. राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, परीक्षा रद्द झाली असली तरी हा खर्च आगामी परीक्षांच्या तयारीसाठी करण्यात आला होता.

    Maharashtra Board will refund the examination fees taken from 10th and 12th students, know what is the process

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!