Central Railway 5800 passengers : मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या व नाशिकला जाणाऱ्या तसेच कसारा, इगतपूरी येथे अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने आज पहाटे ४ वाजता तातडीने १३३ बसेस सोडल्या. या बसेसमधून सुमारे ५ हजार ८०० प्रवाशांना इच्छितस्थळी सुखरूप सोडण्यात आले, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
वृत्तसंस्था
मुंबई : मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या व नाशिकला जाणाऱ्या तसेच कसारा, इगतपूरी येथे अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने आज पहाटे ४ वाजता तातडीने १३३ बसेस सोडल्या. या बसेसमधून सुमारे ५ हजार ८०० प्रवाशांना इच्छितस्थळी सुखरूप सोडण्यात आले, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
परिवहन मंत्री ॲड. परब म्हणाले,मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने हजारो प्रवासी वेगवेगळ्या ठिकाणी अडकले होते. याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांच्या सेवेकरिता एसटी महामंडळाने ठाणे (९३) व नाशिक (४०) विभागातून सुमारे १३३ बसेस उपलब्ध करून देवून पहाटे ४ वाजल्यापासून बस सेवा सुरु करण्यात आली. मुसळधार पाऊस पडत असतानाही एसटी महामंडळाने तातडीने बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे सुमारे ५ हजार ८०० हून अधिक प्रवाशांना इच्छितस्थळी सुखरूप सोडण्यात आले.
पुणे-मुंबई मार्गावर ७४ जादा गाड्या सोडल्या
पावसामुळे पुणे-मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्याकरिता एसटी महामंडळाने पुणे स्थानक येथून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी ६५ जादा बस सोडल्या. तर मुंबईहून ९ बसेस सोडण्यात आल्या, अशी माहिती परब यांनी दिली.
Maha Heavy Rainfall Central Railway 5800 passengers were released safely By ST BUS Says minister Anil Parab
महत्त्वाच्या बातम्या
- आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निवेदनाची प्रत फाडणाऱ्या टीएमसी खासदाराचा आरोप, म्हणाले- हरदीप पुरींनी धमकावले
- ‘एबार शपथ, चलो दिल्ली’, 26 जुलैपासून 5 दिवस ममतांचा दिल्लीत मुक्काम, 2024 ची तयारी?
- मोठी बातमी : स्टील इंडस्ट्रीला मिळणार गुंतवणुकीचे पंख, नव्या PLI मुळे निर्माण होणार 5 लाखांहून जास्त रोजगार
- मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-रायगडसह अनेक भाग जलमय, मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलावली तातडीची बैठक
- Monsoon Session : तृणमूल खासदाराचे संसदेत अभद्र वर्तन, आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातातली निवेदनाची प्रत फाडली