उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचाराचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसून येत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या हिंसाचाराबद्दल खेद व्यक्त करण्यात आला. तसेच या हिंसाचाराच्या निषेधार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने 11 ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. जीवनावश्यक वस्तू या बंदच्या बाहेर ठेवण्यात आल्या आहेत. lakhimpur khiri violence maharashtra bandh on 11th october Shiv sena will actively participate says sanjay raut
वृत्तसंस्था
मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचाराचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसून येत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या हिंसाचाराबद्दल खेद व्यक्त करण्यात आला. तसेच या हिंसाचाराच्या निषेधार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने 11 ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. जीवनावश्यक वस्तू या बंदच्या बाहेर ठेवण्यात आल्या आहेत. हा बंद लक्षात घेऊन महाविकास आघाडीतर्फे आज (9 ऑक्टोबर, शनिवार) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, या बंदमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार आहे. हा बंद 100 टक्के यशस्वी होईल. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.
संजय राऊत म्हणाले, “केंद्र सरकार आणि त्याच्याशी संबंधित पक्षाच्या (भाजप) नसानसांत अमानवीयता भरली आहे. याविरोधात देशातील लोकांना जागृत करण्याची सुरुवात होत आहे. शेतकरी एकटा नाही. आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत. यासाठी महाविकास आघाडीने 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये महाविकास आघाडीशी संबंधित तिन्ही पक्ष सहभागी होणार आहेत. काल शरद पवारांनी असेही म्हटले आहे की, प्रत्येकाने बंदमध्ये सामील व्हावे, देश आणि शेतकऱ्यांना वाटले पाहिजे की आम्ही त्यांच्यासोबत आहोत.
शेतकरी एकटे नाहीत, हे दाखवण्याची वेळ – संजय राऊत
पुढे संजय राऊत म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी मी दिल्लीत होतो. मी राहुल गांधींशीही याबाबत चर्चा केली. महाराष्ट्रासह इतर राज्यांनीही अशी पावले उचलावीत असे ठरले. जिथे आमचे सरकार आहे. जिथे आमची संघटना मजबूत आहे. त्या सर्व राज्यांमध्ये बंद पुकारण्यात यावा. जर आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरू शकत नाही, तर आम्ही जिथे आहोत तेथून पाठिंबा दर्शवावा. लोक झोपलेले नाहीत. अन्नदाते शेतकरी एकटे नाहीत हे दाखवण्याची वेळ आली आहे. म्हणूनच मी एवढेच म्हणेन की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनासुद्धा पूर्ण ताकदीने बंदमध्ये सहभागी असेल. आमचा पूर्ण विश्वास आहे की, जनता या बंदला पाठिंबा देईल, कारण एका केंद्रीय मंत्र्याचा मुलगा चार शेतकऱ्यांना मारूनही कसा मोकाट फिरत आहे, हे देशातील जनता पाहत आहे. त्याचा जनतेच्या मनावरही परिणाम झाला आहे.”
lakhimpur khiri violence maharashtra bandh on 11th october Shiv sena will actively participate says sanjay raut
महत्त्वाच्या बातम्या
- माझ्या कोकणवासीयांना साद, हातात हात गुंफून विकासाच्या यात्रेत सहभागी होऊयात! – नारायण राणे
- वसुली म्हटल्यावर सरकारचा ‘ससा’, शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’; मदत तर त्याहून संतापजनक, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- भाजप विरोधात भाषणे करून ममता बॅनर्जी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसताहेत; अधीर रंजन चौधरी यांचे अचूक शरसंधान!!
- दुर्गा सन्मान : महिला आणि मुलींच्या संरक्षण – सक्षमीकरणात कायमच आघाडीवर!!, वैशाली केनेकर
- लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपींना अटक का करत नाही?, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल