• Download App
    Maharashtra

    Maharashtra : विरोधी पक्षनेता नसणे म्हणजेच लोकशाहीचा गळा घोटणे, विधानसभेत गदारोळ करतविरोधकांचा कामकाजावर बहिष्कार

    vidhan bhavan

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Maharashtra  महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची जागा अद्यापही रिकामीच असल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या विधानसभेतील स्वागत सोहळ्याच्या दिवशीच विरोधकांनी लोकशाहीच्या मूल्यांचा आणि परंपरेचा मुद्दा उपस्थित करत सभागृहात गोंधळ घातला. त्यांनी हे प्रकरण केवळ राजकीयच नव्हे तर लोकशाहीच्या प्रतिष्ठेशी निगडित असल्याचा आरोप करत कामकाजावर बहिष्कार टाकला.Maharashtra

    आज सकाळी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षातील आमदारांनी विरोधी पक्षनेतेपद रिकामे राहणे हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे असल्याचे . “देशाचे सरन्यायाधीश आज विधानसभेत येणार असताना विरोधी पक्ष नेत्याची खुर्ची रिकामी असणे हे महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेस धरुन नाही,” असे भास्कर जाधव यांनी सांगितले.

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावर उत्तर देताना स्पष्ट केले की, विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीचा संपूर्ण अधिकार त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी यासंदर्भात आवश्यक चर्चा व विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला आहे. “मी सर्व कायदेशीर तरतुदी, प्रथा आणि परंपरांचा विचार करून लवकरच निर्णय घेईन,” असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यांनी विरोधकांच्या मागणीबाबत अनौपचारिक बैठकीत आधीच चर्चा झाल्याचेही सांगितले.



    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या विषयावर भूमिका घेत शांततेचे आवाहन केले. “भास्करराव जाधव जो मुद्दा मांडत आहेत, तो योग्यच आहे. मात्र आजचा दिवस न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या सत्काराचा आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाला कुठलाही गोंधळ नको,” असे सांगत त्यांनी पहिले अभिनंदनपर प्रस्ताव सादर करून नंतर योग्य वेळी चर्चा होईल असे सूचित केले.

    भास्कर जाधव यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, “आम्ही अध्यक्ष महोदयांना भेटलो, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही पत्र दिले, पण अद्याप निर्णय घेतलेला नाही. आम्हाला वाद घालायचा नाही, फक्त लोकशाही मार्गाने विषय सोडवायचा आहे.” ते पुढे म्हणाले, “आज सरन्यायाधीशांना विधानसभेत पाहून आम्हाला सांगावे लागेल की, इथे लोकशाही पायदळी तुडवली जाते.”

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जयंत पाटील यांनीदेखील यावर नाराजी व्यक्त करत म्हटले की, “इतक्या मोठ्या व्यक्तींचे स्वागत करत असताना विधानसभेत विरोधी पक्ष नेतेच नाहीत, ही बाब लोकशाहीला शोभणारी नाही. तातडीने यावर निर्णय व्हावा,” अशी त्यांनी अध्यक्षांकडे मागणी केली.

    अध्यक्ष नार्वेकर यांनी पुन्हा एकदा निर्णय लवकरच घेण्याचे आश्वासन दिले असले तरी, विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकत आपला विरोध नोंदवला. अभिनंदनपर प्रस्ताव सादर झाल्यानंतरही भास्कर जाधव यांनी पुन्हा मुद्दा उपस्थित केला. यावर अध्यक्षांनी पुन्हा लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

    Lack of opposition leader means stifling democracy, opposition boycotts proceedings by creating ruckus in the assembly

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    निशिकांत दुबे यांनी दिली उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचाराची यादी; पण “नॅचरल करप्ट पार्टीच्या” सोबतीची कुणी घ्यायची जबाबदारी??

    Raheel Khan : राहील खानच्या वर्तनाचा मनसेकडून निषेध, पक्षाचा कोणताही संबंध नाही; पोलिस कारवाईची मागणी

    विरोधी पक्षनेते पदासाठी संख्याबळ तोकडे, म्हणून महाविकास आघाडीचे नेते सरन्यायाधीशांकडे धावले!!