• Download App
    ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात झालेला पाकचा पराभव साजरा केला नादखुळ्या कोल्हापूरकरांनी | Kolhapur residents celebrate Pakistan's defeat in the match against Australia

    ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात झालेला पाकचा पराभव साजरा केला नादखुळ्या कोल्हापूरकरांनी

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : गुरुवारी झालेल्या विश्वचषकातील सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला. आणि या पराभवामुळे पाकिस्तानला अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे पाकिस्तानचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मात्र अपुरे राहिले आहे. हा सामना संपताच कोल्हापुरातील चौकाचौकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

    Kolhapur residents celebrate Pakistan’s defeat in the match against Australia

    ट्वेन्टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाल्याने, कोल्हापूरमधील क्रिकेटप्रेमींची पार निराशा झाली होती. याचाच वचपा काढण्यासाठी म्हणून काल कोल्हापूरमध्ये दुसऱ्यांदा दिवाळी साजरी करण्यात आली. चौकाचौकामध्ये उत्साही युवकांनी दुचाकीवरुन शहरातून फेऱ्या मारत पाकच्या पराभवाबद्दल जल्लोष व्यक्त केला. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पुन्हा एकदा दिवाळी असल्याचा भासच जणू निर्माण झाला होता. या उत्सवातून पाक संघांबाबतचा राग कोल्हापूरकरांनी व्यक्त केला आहे.


    कोल्हापूर आरटीओ विभाग प्रायव्हेट बसेस वर करणार कारवाई


    मागे जम्मू काश्मीरमधील दोन मेडिकल स्टुडंट्सना पाकिस्तानचा विजय साजरा केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये देखील काही लोकांनी पाकिस्तानचा विजय साजरा केला म्हणून त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली होती.

    हार आणि विजय हा खेळाचा भाग असतो. जिंकले तर स्वच्छ मनाने आनंद साजरा करता आला पाहिजे आणि हरल्यानंतर सुद्धा मोठ्या मनाने हार स्वीकारता आली पाहिजे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कॅप्टन विराट कोहली. देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू मोठ्या मनाने खेळताना दिसून येतात.

    Kolhapur residents celebrate Pakistan’s defeat in the match against Australia

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!