• Download App
    राज्यातील बालवाडी ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 वाजेनंतर भरवा, राज्यशासनाकडून परिपत्रक जारी|Kindergarten to 4th classes in the state should be filled after 9 am,Circular issued by the State Govt

    राज्यातील बालवाडी ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 वाजेनंतर भरवा, राज्यशासनाकडून परिपत्रक जारी

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 वाजता किंवा नऊ वाजेनंतर भरवाव्यात, असे आदेश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या वतीने परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे शाळांना आता चौथी पर्यंतच्या वर्गाचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे.Kindergarten to 4th classes in the state should be filled after 9 am,Circular issued by the State Govt



    राज्यपाल म्हणाले होते- शाळांचा वेळ बदलावा

    राज्यपाल रमेश बैस यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात सांगितले होते की, आजकाल लोकांच्या जीवनशैली बदलली आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली बदलल्याने घरातील लहान मुलांवर देखील त्याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे सकाळी सकाळी मुलांना झोपेतून उठवून शाळेत पाठवणे तसे अवघड झाले. परिणामी मुलांची झोप होत नाही. त्यामुळे मानसिक आजारांना देखील सामोरे जावे लागत आहे, असे सांगत त्यांनी लहान मुलांच्या शाळांची वेळ ही सकाळी न करता त्याचा कालावधी वाढवला पाहिजे, उशीरा शाळा सुरू केल्या पाहिजे, अशी सूचना केली होती.

    Kindergarten to 4th classes in the state should be filled after 9 am,Circular issued by the State Govt

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ajit Pawar : प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो; शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    Anjali Damania : पार्थ पवारांचे जमीन घोटाळा प्रकरण, न्यायालयामध्ये जाण्याचा दमानियांनी दिला इशारा

    Uday Samant : शिंदे गटाने फेटाळली नाराजीची चर्चा, मंत्री उदय सामंत म्हणाले – आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना नाही तर कुणाला सांगणार