प्रतिनिधी
मुंबई : देवेंद्र – फडणवीस सरकारने सुरू केलेली पण नंतरच्या ठाकरे – पवार सरकारने बंद केलेली जलयुक्त शिवार योजना शिंदे – फडणवीस सरकार पुन्हा सुरू करणार असल्याची बातमी आहे. या योजनेला फडणवीस सरकारच्या शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. मात्र, या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे सांगून ठाकरे – पवार सरकारने योजनेची चौकशी लावून ही योजना बंद केली होती. Jalyukta Shivar Yojana will resume
शिंदे – फडणवीस सरकारने मात्र जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
जलयुक्त शिवार योजनेचे फायदे!!
- प्रत्येक गावात सरकार, एनजीओ आणि लोक सहभागातून नदी नाल्यातील गाळ काढून छोटे बंधारे बांधून पाणी अडवलं गेलं.
- अनेक वर्षांपासून लुप्त झालेल्या नद्यांचे पूनर्जीवन करण्यात आले
- पावसाचे पाणी वाया न जाता जमीनीत मुरेल अशी व्यवस्था केली गेली.
- ‘जलयुक्त शिवारमुळे १२५०० गावे कायमस्वरूपी टँकर मुक्त झाली.
- जलयुक्त शिवारामुळे १८००० गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला.
- टँकर माफिया राजला धक्का बसला.
Jalyukta Shivar Yojana will resume
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरे -प्रकाश आंबेडकर एकत्र येणार : महापालिकांसाठी युतीची तयारी; मुंबई, औरंगाबाद मनपात विजयासाठी रणनीती
- अंधेरी पोटनिवडणूक : शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा, शिंदे गट हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप
- राष्ट्रवादीचा आरोप :मुख्यमंत्र्यांचा बीकेसीवरील मेळावा फेल, तपासे म्हणाले- धोरणही जाहीर करता आले नाही
- ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ म्हणणार्या मोदींच्या रेल्वे मंत्रालयात चार लाख डॉलरची लाच; सीबीआयमार्फत चौकशी करण्याची राष्ट्रवादीची मागणी