विशेष प्रतिनिधी
ठाणे – ‘पूरस्थिती उद्भवलेल्या भागात केवळ पाहणी दौरे महत्त्वाचे नाहीत. आपद्ग्रतस्तांपर्यंत प्रत्यक्ष मदतकार्य पोहोचवणे महत्त्वाचे आहे. यापूर्वीही राज्यात अशा घटना घडल्या आहेत; मात्र कोणत्याच सरकारला शहरांच्या नियोजनाकडे लक्ष द्यायला वेळ नाही,’’ अशी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी येथे केली.Help peoples in flood hit area instead of only visits
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले. दरड कोसळून गाव ढिगाऱ्याखाली गाढली गेली.
पूरग्रस्त भागात मुख्यमंत्र्यांसह विविध राजकीय पक्षांनी पाहणी दौरे केले. या दौऱ्यांचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला. या घटना घडल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी या ठिकाणी पाहणी केली.
मीही मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आदेश दिल्यानंतर माझा मनसैनिक कानाकोपऱ्यात जाऊन पोचला. पाहणी करणे वाईट नाही; मात्र केवळ पाहणी दौरे करण्यापेक्षा मदतकार्य करणे महत्त्वाचे असल्याचे राज यांनी सांगितले.
Help peoples in flood hit area instead of only visits
महत्त्वाच्या बातम्या
- सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जलवा, ट्विटर अकाऊंट सात कोटी फॉलोअर्स
- टाटा मोटर्स पुढील आठवड्यात वाढविणार मोटारींच्या किंमती, टियोगो, नेक्सॉन, हैरियार आणि सफारी होणार महाग
- बड्या घरचे श्वान शोधण्यासाठी पोलीस आणि महापालिकेची यंत्रणा लागली कामाला, पाकिस्तानातील गुजराणवाला येथील प्रकार
- बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी केंद्राने संसदेने मंजूर केले बाल न्याय सुधारणा विधेयक
- जगभर ढोल वाजवलेले कोरोनाविरुद्धचे केरळ मॉडेल अपयशी ठरतंय..? आकडेवारी तरी तसेच सांगतेय…