कंगना म्हणली की ,”देशाला १९४७ मध्ये मिळाले ते स्वातंत्र्य नव्हते, तर ती भीक होती. खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले”.Government should withdraw Padma award from Kangana Ranaut; Demand of Congress spokesperson Gaurav Vallabh
विशेष प्रतिनिधी
मुंबई : एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात कंगना राणावतने आक्षेपार्ह विधान केले. या कार्यक्रमात भारतीय स्वातंत्र्याबाबत बोलताना कंगनाने वादग्रस्त विधानांची परंपरा कायम राखत नव्या वादाला तोंड फोडले. यावेळी कंगना म्हणली की ,”देशाला १९४७ मध्ये मिळाले ते स्वातंत्र्य नव्हते, तर ती भीक होती. खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले”.
कंगना राणावतला काही दिवसांपूर्वीच पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी कॉंग्रेसने केली. ‘अपात्र व्यक्तींना पद्मपुरस्कार दिल्याने असे होते. कंगनाने संपूर्ण देशवासीयांची माफी मागावी. सरकारने तिच्याकडून पद्मपुरस्कार परत घ्यावा’, अशी मागणीही गौरव वल्लभ यांनी केली.कंगनाचे विधान हा थेट देशद्रोह ठरतो, असही गौरव वल्लभ म्हणाले.
तसेच कंगना राणावतविरोधात कलम ५०४, ५०५ आणि १२४ अ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुंबई पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
Government should withdraw Padma award from Kangana Ranaut; Demand of Congress spokesperson Gaurav Vallabh
महत्त्वाच्या बातम्या
- सध्या राज्यात राजकीय टोळीयुद्ध,उध्दव ठाकरेंकडून शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा, राजू शेट्टी यांची टीका
- ममता बॅनर्जींनी माजी टेनिस स्टार लिएंडर पेसला उतरविले गोवा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात, तृणमूल कॉँग्रेसचा मुख्य चेहरा होणार
- भुजा भुजामध्ये समता म्हणून भुजबळांवर उल्लेख पण सावकरांचा उल्लेखच नव्हता, साहित्य संमेलनाच्या गीतात, सावकरप्रेमींच्या संतापानंतर आयोजकांना उपरती
- गॅँगस्टरच्या पत्नीचा धक्कादायक आरोप, पतीनेच उच्चपदस्थांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, राजीव शुक्ला, हार्दिक पंड्या, मुनाफ पटेल यांनी केला बलात्कार
- सत्तेचा माज आला असे वागू नका, एसटी कर्मचाऱ्याशी चर्चा करा, सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा