• Download App
    कोकणात माहेरवाशीण गौरीचा ओवसा कसा भारतात? काय आहे ही परंपरा Gauri Ganpati festival news

    कोकणात माहेरवाशीण गौरीचा ओवसा कसा भारतात? काय आहे ही परंपरा

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर जिथे जिथे मराठी लोकं आहेत. तिथे सगळीकडेच आता सध्या गणेशोत्सवाची लगबग बघायला मिळते. आपल्या सर्वांच्या लाडका बाप्पाचा गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला. महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात आणि मंडळांमध्ये बाप्पाच्या आगमनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. मखर सजली प्रसादाची तयारी झाली आहे. Gauri Ganpati festival news

    कोणाच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो तर कोणाकडे दहा दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला जातो. आणि गणेशोत्सवाचाच अविभाज्य भाग म्हणजे गौरी. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये गौरी महालक्ष्मी हा सण साजरा करायची वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत.

    मराठवाड्यामध्ये गौरीलाच महालक्ष्मी म्हटलं जातं. सोन्याच्या पावलाने ज्येष्ठा कनिष्ठ आल्या असं म्हणत महालक्ष्मीची स्थापना केली जाते. तर कोकणातला गौरी गणपतीचा उत्सव हा वेगळा असतो. गणपती बाप्पा सोबत येणाऱ्या या गौरीची स्वागताची परंपरा ही वेगळी आहे. घरोघरी या माहेरवाशिणीचे वेगवेगळ्या रुपात स्वागत करत पाहुणचार केला जातो. यामुळे या सणाला गौरी गणपतीचा सण असेही म्हटले जाते आणि महाराष्ट्रात तो भक्तीभावाने, उत्साहात साजरा केला जातो. या गौराईच्या स्वागतावेळी कोकणात नववधूने ओवसा भरण्याची परंपरा साजरी केली जाते.

    गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या-चौथ्या दिवशी गौराईची स्थापना केली जाते. गौराईच्या सणाचे विशेष म्हणजे, महाराष्ट्रात वेशीवेशीवर या माहेरवाशिणीच्या पूजेची पद्धत, नैवेद्याची पद्धत बदलते. वाजत, गाजत, नवी साडी- चोळी आणि दागिन्यांनी मढवून गौराईला घरी आणले जाते. या गौराईची स्थापना, तयारी माहेरवाशिणीच्या हातून केली जाते. कोकणात गौरी पूजनाच्या दिवशी गौरीचा ओवसा भरण्याची पद्धत साजरी केली जाते.

    Gauri Ganpati festival news

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ajit Pawar : प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो; शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    Anjali Damania : पार्थ पवारांचे जमीन घोटाळा प्रकरण, न्यायालयामध्ये जाण्याचा दमानियांनी दिला इशारा

    Uday Samant : शिंदे गटाने फेटाळली नाराजीची चर्चा, मंत्री उदय सामंत म्हणाले – आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना नाही तर कुणाला सांगणार