• Download App
    विधानसभेसाठी महायुतीचा मेळावा; अजित पवार म्हणाले- पराभवाचे चिंतन गरजेचे|Gathering of the Grand Alliance for the Legislative Assembly; Ajit Pawar said - Contemplation of defeat is necessary

    विधानसभेसाठी महायुतीचा मेळावा; अजित पवार म्हणाले- पराभवाचे चिंतन गरजेचे

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लोकसभेनंतर आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. यावेळीलोकहिताचे निर्णय मार्गी लावण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीने सहकार्याने केला. लोकहिताला प्राधान्य देण्यात आलं. शाश्वत विकासाचे काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरीही राज्यात महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही, असे अजितदादा म्हणाले. त्यांनी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्याबदद्ल अभिनंदन केले.Gathering of the Grand Alliance for the Legislative Assembly; Ajit Pawar said – Contemplation of defeat is necessary



    लोकसभेतील पराभवाचे खापर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर फोडले होते. त्यांनी संविधान आणि इतर गोष्टींचा गैरसमज पसरवल्याने महायुतीचा पराभव झाल्याचे बोलले जात होते. पण अजितदादांनी महायुतीला पण आत्मचिंतन करायला लावले. त्यांनी महायुतीचा पराभव कशामुळे झाला, याचे झणझणीत अंजनच महायुतीच्या डोळ्यात घातले.

    विभागनिहाय, जिल्हानिहाय, तालुकानिहाय समन्वय साधण्याचे ठरवलं होतं पण ते झालं नाही. महायुतीत समन्वय राखण्यात अपयश आल्याची अजित पवारांची जाहीर कबुली अजितदादांनी या मेळाव्यात बोलताना दिली. विरोधकांनी पसरविलेला गैरसमज हाणून पाडण्याचं काम आपण केलं पाहिजे. आता समन्वय राखण्यासाठी लगेच कामाला लागू, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

    Gathering of the Grand Alliance for the Legislative Assembly; Ajit Pawar said – Contemplation of defeat is necessary

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !

    महाराष्ट्र शासन आणि नाम फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार; ग्राम प्रणालीतून ग्रामीण भागाचा विकास साधणार!!