विशेष प्रतिनिधी
नागपूर : Mohan Bhagwat दबावाने किंवा लोभाने धर्मांतर घडवणे ही एक प्रकारची हिंसाच आहे. मात्र, जर एखाद्याने स्वेच्छेने धर्मांतर केले तर त्यास संघाचा विरोध नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.Mohan Bhagwat
नागपूरमध्ये आरएसएसच्या कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, “कोणालाही त्यांच्या पूर्वजांच्या निवडींविषयी चुकीचे वाटायला लावणे किंवा त्यांचा अपमान करणे योग्य नाही. धर्मांतर हे जर प्रेम, लोभ किंवा जबरदस्तीने होत असेल, तर आम्ही त्याच्या विरोधात आहोत. स्वेच्छेने कोणी धर्म बदलत असेल, तर त्यास आमची हरकत नाही.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या आदिवासी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम यांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, “धर्मांतरविरोधी लढ्यात आम्ही तुमच्यासोबत आहोत.”
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त झाला. त्यानंतर भारत सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर प्रतिहल्ला केला. यावर भाष्य करताना भागवत म्हणाले, या कारवाईने भारताचे धाडस, सैन्याचे शौर्य आणि प्रशासनाची खंबीरता स्पष्ट झाली. देशाने एकजूट दाखवली आणि राजकीय वर्गातही परस्पर समजूतदारपणा दिसून आला. हे एकतेचे आणि राष्ट्रहिताचे वातावरण कायम राहायला हवे. जे देशाशी थेट युद्ध करू शकत नाहीत, ते आता प्रॉक्सी वॉरद्वारे देशात रक्तपात घडवत आहेत.”
दुसऱ्या महायुद्धातील चर्चिल यांच्या संघर्षाच्या उदाहरणाचा उल्लेख करत भागवत म्हणाले की, “समाज हा खरा सिंह आहे, आणि नेतृत्व हे केवळ त्याच्या वतीने गर्जना करणारे आहे. भारतीय समाजात वेगवेगळ्या भाषा, संस्कृती आणि प्रथा असूनही एकतेतच आपली खरी ओळख आहे. वांशिक किंवा जातीय भेदाभेद ही ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणांची फळे आहेत. अशा खोट्या कल्पनांना बळी न पडता देशहितासाठी आपण एकत्र राहणे आवश्यक आहे,” असा संदेश मोहन भागवत यांनी दिला.
Forced conversion is violence, there is no problem if it is done voluntarily, says RSS chief Mohan Bhagwat
महत्वाच्या बातम्या
- Thackrey – Pawar : ठाकरे बंधू आणि पवार काका – पुतण्याला भाजपच्या ताकदीची भीती; त्याहीपेक्षा दोन्ही कडच्या नेत्यांना एकत्र येण्याची धास्ती!!
- Ek Peed Maa Ke Naam : एक पेड मॉं के नाम मोहिमेत महाराष्ट्राची चांगली कामगिरी; आता हरित महाराष्ट्रासाठी 10 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट!!
- सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये संभाव्य एन्ट्री, पुढच्या राजकारणातला धोका ओळखून आमदार सीमा हिरे यांचा विरोध; पण निर्णय काय होणार??
- Kamal Haasan : कन्नड भाषा वादावर कमल हसन यांनी माफी मागण्यास दिला नकार, म्हणाले..