• Download App
    ED Raid : अजित पवारांच्या अडचणीत वाढ! ईडीचा थेट निकटवर्तीयांच्या मालमत्तेवर छापाED Raid: Ajit Pawar's difficulty increases! ED's direct raid on nearby property

    ED Raid : अजित पवारांच्या अडचणीत वाढ! ईडीचा थेट निकटवर्तीयांच्या मालमत्तेवर छापा

    अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरे आणि कार्यालयांची आयकर अधिकाऱ्याकडून झडती घेतली जात असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे.ED Raid: Ajit Pawar’s difficulty increases! ED’s direct raid on nearby property


    विशेष प्रतिनिधी

    बारामती : बारामती औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीसह तालुक्यातील काटेवाडी येथे गुरुवारी (दि.७) केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरु आहे. आयकर विभागाकडून ही छापेमारी सुरु असल्याचे बोलले जात आहे.

    दरम्यान गुरुवारी सकाळपासूनच सुरु झालेल्या या छापेमारीमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरे आणि कार्यालयांची आयकर अधिकाऱ्याकडून झडती घेतली जात असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे.



    या कारखान्यांवर छापे

    यात जरंडेश्वर साखर कारखाना, दौंड शुगर, आंबलिक शुगर , पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं कळत आहे.

    किरीट सोमय्या ‘चॅलेंज’

    ईडी अथवा आयकर विभाग यापैकी एका विभागाकडून ही चौकशी सुरु आहे. यासंबधी अद्याप अधिकृत माहिती हाती आलेली नाही. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्यावरुन अजित पवारांना किरीट सोमय्यांनी ‘चॅलेंज’ केले होते. त्यांच्या आरोपामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं.

    सुत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे समजते. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या बारामती दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवसापासून ही छापेमारी सुरु झाल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

    ED Raid: Ajit Pawar’s difficulty increases! ED’s direct raid on nearby property

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!