• Download App
    न्यायालयाच्या तंबीनंतरही नबाब मलिकांकडून बदनामी सुरूच, ज्ञानदेव वानखेडे यांची पुन्हा एक याचिका |Dnyandev Wankhede's petition after defamation from Nawab Malik

    न्यायालयाच्या तंबीनंतरही नबाब मलिकांकडून बदनामी सुरूच, ज्ञानदेव वानखेडे यांची पुन्हा एक याचिका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : न्यायालयाने तंबी दिल्यानंतरही अल्पसंख्यांक विकास मंत्री नबाब मलिक ऐकायला तयार नाहीत. त्यांच्याकडून वानखेडे कुटुंबाची बदनामी सुरूच आहे. त्यामुळे एनसीबी मुंबईचे माजी विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे.Dnyandev Wankhede’s petition after defamation from Nawab Malik

    वानखेडे कुटुंबीयांची बदनामी करणार नाही, असे आश्वासन देऊनही मलिक सातत्याने आमची बदनामी करत आहेत, असे वानखेडे यांनी अवमान याचिकेत म्हटले आहे. २८ डिसेंबर २०२१, २ आणि ३ जानेवारी २०२२ या तीन दिवशी मलिक यांनी उच्च न्यायालयाला दिलेल्या आश्वासनाचा भंग केल्याचे त्यांनी म्हटले आहे.



    आर्यन खान अटकेनंतर नवाब मलिक यांनी एनसीबीचे तत्कालीन विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांना त्यांच्या कामकाजावरून लक्ष्य केले. मलिक यांनी समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात पत्रकार परिषदा घेतल्या व ट्विटरवरही पोस्ट केल्या. त्याविरोधात वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी उच्च न्यायालयात मलिक यांच्याविरोधात मानहानी दावा दाखल केला.

    Dnyandev Wankhede’s petition after defamation from Nawab Malik

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- धर्मच मला व मोदींना चालवत आहे, जोपर्यंत धर्म भारताला मार्गदर्शन करेल, तोपर्यंत देश विश्वगुरू राहील