• Download App
    जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारले; तुम्हाला वरपास केले; देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीकाDevendra fadnavis on uddhav thackeray says he is trying to change constitution, and People reject Congress-NCP; Passed you 

    जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारले; तुम्हाला वरपास केले; देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका

    वृत्तसंस्था

    मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मनसुबे आहेत. जनतेने भाजपला नव्हे तर काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारले असून तुम्हाला वरपास केले, अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आज टीका केली. Devendra fadnavis on uddhav thackeray says he is trying to change constitution, and People reject Congress-NCP; Passed you

    शिवसेनेचा दसरा मेळाव्यादरम्यान बोलत असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. या पार्श्वभूमीवरते आज नागपूरात माध्यमांशी बोलत होते.

    फडणवीस म्हणाले, “तुम्ही ज्या आविर्भावात सांगताय की जनतेने भाजपला नाकारलं. तर नव्हे, जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारलं आणि तुम्हाला वरपास केलं. त्यामुळे हे बेईमानीने तयार झालेले सरकार आहे. आतातरी उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा बाजूला सारुन सांगावं की त्यांना मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा होती आणि ती पूर्ण केली.



    दिलेला शब्दच जर पूर्ण करायचा होता तर इतर कोणा शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आलं असतं. सुभाष देसाई, दिवाकर रावते होते. मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा नव्हती तर नारायण राणे, राज ठाकरेंना का बाहेर जावं लागलं? मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचाय, म्हणजे नक्की काय करायचंय? खंडणीबाजीमुळे बंगालमध्ये एकही उद्योग टिकलेला नाही. तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हात पाय तोडून त्याला फासावर लटकवायचा असा महाराष्ट्र घडवायचा आहे का? आमच्यात जोवर रक्ताचा एक थेंब आहे तोवर आम्ही, महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. महाराष्ट्र महाराष्ट्रच राहील”.

    फडणवीस पुढे म्हणाले, “काल माननीय मुख्यमंत्र्यांनी संघराज्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आणि ही व्यवस्था बदलली पाहिजे असं सांगितलं. म्हणजे काय? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच बदलण्याचे मनसुबे त्यांनी काल बोलून दाखवले. काहीही झालं तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदललं जाणार नाही, ते कोणी बदलू शकणार नाही. त्यामुळे हे संविधान बदलण्याचे छुपे अजेंडे, काही कम्युनिस्ट लोकांना सोबत घेऊन आणि तशाच डाव्या विचारांच्या काही पक्षांच्या सोबतीने हा जो मनसुबा तुम्ही रचताय, तो आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही”.

    Devendra fadnavis on uddhav thackeray says he is trying to change constitution, and People reject Congress-NCP; Passed you

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Shinde : मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला शिवसेनेचा महापौर व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना – एकनाथ शिंदे

    Navneet Rana : नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी- बाबा सिद्दिकीसारखीच तुमची हत्या करू, पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

    Devendra Fadnavis : विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र भारताचे ‘गेटवे ऑफ इंडिया’; राज्याच्या सर्व भागासाठी वैविध्यपूर्ण क्षेत्रांत गुंतवणूक येणार- CM देवेंद्र फडणवीस