• Download App
    '' हा तर एका कणखर व्यक्तिमत्त्वाचा यथार्थ सन्मान''|Deputy Chief Minister Devendra Fadnavis congratulated LK Advani on the announcement of Bharatna Award

    ” हा तर एका कणखर व्यक्तिमत्त्वाचा यथार्थ सन्मान”

    देवेंद्र फडणवीस यांनी केले लालकृष्ण अडवाणी यांचे अभिनंदन


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भारताचे माजी उपपंतप्रधान आणि आमचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर होणे, हा एका कणखर व्यक्तिमत्त्वाचा यथार्थ सन्मान आहे, असे सांगत या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे आणि लालकृष्ण अडवाणींचे अभिनंदन केले आहे.Deputy Chief Minister Devendra Fadnavis congratulated LK Advani on the announcement of Bharatna Award



    लालकृष्ण अडवाणी यांनी ‘लोहपुरुष’ या नात्याने एक कणखर गृहमंत्री म्हणून देशाची सेवा केली. विशेषत: श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली. सुमारे 6 दशके त्यांनी राजकारणात घालविली. एक निष्कलंक व्यक्तिमत्त्व तर ते आहेतच, शिवाय राष्ट्रसेवेत त्यांची मोठी भूमिका राहिली आहे. राजकारणात अशाप्रकारचे चारित्र्य त्यांनी सांभाळले आणि विविध विषयांचा त्यांचा सातत्याने व्यासंग राहिला. त्यांना भारतरत्न ही उपाधी जाहीर झाल्याबद्दल मला व्यक्तिगत आनंद झाला आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

    लालकृष्ण अडवाणी यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली. खुद्द पंतप्रधान मोदींनी ही माहिती दिली.

    तर लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्याची बातमी समजताच ते भावूक झाले. लालकृष्ण अडवाणी यांची पहिली झलक समोर आली आहे, ज्यामध्ये ते जनतेला आणि मीडियाला हात जोडून अभिवादन करताना दिसत आहेत.

    Deputy Chief Minister Devendra Fadnavis congratulated LK Advani on the announcement of Bharatna Award

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    17 मुले आणि दोन वृद्धांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काऊंटर; त्याला कुणाशी, कशासंदर्भात बोलायचे होते??, प्रश्न अनुत्तरीत!!

    सत्याच्या मोर्चाची दुसरी बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये; राज आणि उद्धव हजर, पण पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मात्र गैरहजर, बैठकीचे महत्त्व राहिलेच काय??

    Maharashtra SEC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅट नाहीच; कायद्यात तरतूद नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण