• Download App
    Defamation of the statue is an attack on the sentiments of the people and the identity of the nation - Ajit Pawar

    पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासीयांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला – अजित पवार

    पुढे अजित पवार म्हणाले की , छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी मोठे आदर्श आहेत.Defamation of the statue is an attack on the sentiments of the people and the identity of the nation – Ajit Pawar


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बंगळूरमध्ये काही समाजकंटकांनी गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग टाकत महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना घटनेबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की , अशा कुठल्याच घटनेने छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी जराही कमी होणार नाही, पण अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नसल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.या घटनेविषयी दु:ख व्यक्त करत त्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.



    पुढे अजित पवार म्हणाले की , छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी मोठे आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरू शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासीयांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला केल्यासारखा आहे.

    या घटनेकडे कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकारने गांभीर्याने पहावे, दोषींना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

    Defamation of the statue is an attack on the sentiments of the people and the identity of the nation – Ajit Pawar

    Related posts

    Shaktipeeth Expressway शक्तिपीठ मार्गावरून फडणवीसांच्या धमकीमुळे पवारांची झोप उडाली; पण मोदींनी त्यात लक्ष घातल्यावर पवारांचे काय उडेल??

    माळेगावची निवडणूक शरद पवारांनीच अजितदादांना जिंकून दिल्याची मराठी माध्यमांची टिमकी; प्रत्यक्षात पवारांची ताकद मते फोडण्यापुरतीच उरली!!

    Malegaon sugar factory election result 2025 अजितदादांना नको असलेले चंद्रराव तावरे विजयी; माळेगावच्या कारखान्यात चालणार नाही मनमानी!!