• Download App
    Sanjay Raut अहमदाबाद विमान अपघातामागे सायबर हल्ला? संजय राऊत यांची गंभीर शंका; अदानींवरही अप्रत्यक्ष टोला

    Sanjay Raut : अहमदाबाद विमान अपघातामागे सायबर हल्ला? संजय राऊत यांची गंभीर शंका; अदानींवरही अप्रत्यक्ष टोला

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अहमदाबाद येथील भीषण विमान अपघातामागे सायबर हल्ला असू शकतो, अशी गंभीर शंका शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली. “एकाचवेळी दोन्ही इंजिन बंद पडणे हे केवळ अपघात नव्हे, तर कुठल्या तरी योजनाबद्ध सायबर हस्तक्षेपाचे परिणाम असू शकतात,” असे मत त्यांनी व्यक्त करत यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. Sanjay Raut

    गुरुवारी दुपारी अहमदाबादमधील मेडिकल कॉलेजजवळ एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान कोसळले. या दुर्घटनेत २४२ प्रवासी, १० क्रू मेंबर्स आणि काही स्थानिक रहिवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर देशभरात हवाई वाहतूक सुरक्षेवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. Sanjay Raut

    संजय राऊत म्हणाले, “विमान नेमके अहमदाबादमध्येच का कोसळले? या विमानतळाची देखरेख कोण करतं? येथे सुरक्षा व्यवस्थेचा फोलपणा होता का? सायबर हल्ल्यामुळे इंजिन फेल झाले का? हे गंभीर प्रश्न आहेत. देशातील आणि परदेशातील तपास यंत्रणा – ब्रिटन, पोर्तुगाल आणि बोईंग कंपनीसह – या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. त्यामुळे सध्या कोणताही निष्कर्ष लावणे योग्य ठरणार नाही, पण संशय बळावत आहे.” Sanjay Raut



    राऊत म्हणाले , “देशावर सायबर हल्ल्यांचे सावट कायम आहे. आपल्या लष्करी नेटवर्कवरही अनेक वेळा हल्ल्यांचे प्रयत्न झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर एअरक्राफ्ट सिस्टिम हायजॅक होणे ही शक्यता नाकारता येत नाही. विमानांची संपूर्ण यंत्रणा संगणकीय नियंत्रणात असते. जर कोणी सायबरद्वारे मुख्य फ्युएल व्हॉल्व बंद केला असेल, तर विमानाला 30–40 सेकंदातच इंजिन बंद पडू शकते. या अपघातात घडलेले नेमके हेच आहे.”

    या दुर्घटनेत सरकारी यंत्रणांचा हलगर्जीपणा होता का, असा सवाल करत राऊत यांनी अप्रत्यक्षपणे अदानी समूहावरही निशाणा साधला. “अहमदाबाद विमानतळ सध्या कुणाच्या ताब्यात आहे? तिथे देखभाल आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी आवश्यक मनुष्यबळ आहे का? की ही जबाबदारी अर्धवट मनुष्यबळावर सोपवण्यात आली आहे?” असा सवाल करून त्यांनी खासगीकरणावरही टीका केली.

    “जर हवाई प्रवास सुरक्षेबाबत लोकांच्या मनातील प्रश्नांना वेळीच उत्तर दिले नाही, तर लोकांचा विश्वास उडेल आणि प्रवासी संख्या घटू शकते,” असा इशाराही त्यांनी दिला.

    Cyber ​​attack behind Ahmedabad plane crash? Sanjay Raut’s serious suspicion

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : परदेशी शिक्षणाची गंगा आता मुंबईच्या अंगणी!

    Vijay wadettiwar : वडेट्टीवारांनी हाणली पवारांची कॉपी; पण निदान त्यांची कारणे तरी मोठी!!

    Ajit Pawar : पुण्यात पाऊस अन् कोरोनाबाबत प्रशासन सतर्क, ठोस उपाययोजना करण्यास सुरूवात