पुण्यातील एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांना थेट नवरत्न तेल डोक्याला लावण्यासाठी पाठवले आहे.Criticism of Sharad Pawar in one language, then a gift of ‘Navratna oil bottle’ to Chandrakant Patil directly from NCP activist!
विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच कलगीतुरे रंगताना पहायला मिळत आहेत. त्यातच सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. मात्र या वक्तव्याचा निषेध करत पुण्यातील एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांना थेट नवरत्न तेल डोक्याला लावण्यासाठी पाठवले आहे.
संदीप काळे असे या कार्यकर्त्यांचे नाव आहे. यावर उत्तर देताना काळे याने म्हटले आहे की, आपण कुणाबद्दल बोलतो, आपली तेवढी उंची आहे का, बोलताना जरा डोकं शांत ठेवून टीका करत जा, म्हणून हे नवरत्न तेल तुमचं डोकं शांत करण्यासाठी पाठवत आहे. आणि तरीही तुमचं डोकं शांत नाही झालं तर, त्याचा इलाज मी स्वखर्चाने करतो, असा इशाराच या कार्यकर्त्याने दिला आहे.
चंद्रकांत पाटील यांची शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका
सांगलीत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळं आयुष्य गेलं, कधी 60 वर तो गेला नाही, अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती.
चाकणकरांकडूनही चंद्रकांत पाटील यांचा समाचार
चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही चंद्रकांत पाटील यांचा जोरदार समाचार घेतला. चंद्रकांत पाटील आपलं वय आहे, तेवढी त्यांची कारकीर्द आहे. आपण बोलताना जरा सांभाळून बोलायला हवं. मी तुम्हाला हे परत परत सांगतीय. राजकारणात एकेरी भाषेत बोलू नये, असं त्या म्हणाल्या.
Criticism of Sharad Pawar in one language, then a gift of ‘Navratna oil bottle’ to Chandrakant Patil directly from NCP activist!
महत्त्वाच्या बातम्या
- तामिळनाडूत सत्ता गमावल्यानंतरही अम्मांच्या सावलीत अण्णा द्रमूकच्या सुवर्ण महोत्सवाचे सेलिब्रेशन, पण पक्ष करिष्माई नेत्याच्याही शोधात!!
- पेट्रोल – डिझेलचे भाव भडकलेले असताना किमती स्थिर ठेवण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न; पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींची माहिती
- अंदमान आणि निकोबारला देशभक्तांसाठी तीर्थक्षेत्र बनवणार; अमित शाह यांचा निर्धार
- ड्रग्जचा विळखा : महाराष्ट्रात तीन वर्षांत अमली पदार्थांच्या व्यसनामुळे १०२ जणांचा मृत्यू, तामिळनाडू, यूपी, राजस्थानसह या राज्यांतही चिंता वाढली