• Download App
    Jayant Patil सत्ताधाऱ्यांकडून कर्जमाफीला सोयीस्करपणे बगल, जयंत पाटील यांची टीका

    Jayant Patil सत्ताधाऱ्यांकडून कर्जमाफीला सोयीस्करपणे बगल, जयंत पाटील यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : सत्तेवर येण्याच्या आधी ज्यांनी कर्जमाफीची घोषणा केली त्यांनी सत्तेवर आल्यावर मात्र सोयीस्करपणे कर्जमाफीला बगल दिली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांनी केली.

    पाटील म्हणाले, लाडक्या बहिणींना एकवेळ १५०० रुपयाचे २१०० रुपये पण दिले जातील पण ते पुढच्या निवडणुकीच्या तोंडावर दिले जातील. आता आम्ही कोणतीही घोषणा करू शकत नाही, कारण आमचा जोरात पराभव झाला आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर ३ लाख ६८९ शेतकऱ्यांना ३४१ कोटी ४८ लाख रुपये कर्जमाफी दिली होती. आपल्या जत तालुक्यातील १२ हजार ७१० शेतकऱ्यांना ६७ कोटी ६४ लाख रुपये कर्जमाफी दिली.



    मोबाइलवरील व्हॉटसॲपचा वापर आता सार्वत्रिक झाला असून यावर येणारी माहिती केवळ गुन्हेगारी स्वरूपाची आणि राजकीय टीका-टिप्पणीचीच अधिक असते. मोबाइलवर बलात्काराच्या घटनेची माहिती घेत असतानाच, एखादी खून झाल्याची माहिती हाती येते, तर दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणीची माहिती मिळते, अशी खंत व्यक्त करत पाटील म्हणाले.

    एक का अनेक लफडी या मोबाइलच्या माध्यमातून वापरकर्त्यांच्या मनावर आघात करत आहेत. यामुळे मूळ प्रश्न दुर्लक्षितच होत आहे. बेरोजगारीसारखी गंभीर समस्या आ वासून समोर असताना त्याकडे तरुण वर्गाचे दुर्लक्ष होत आहे. उद्याचे भविष्य हाती असताना तरुणाई आभासी जगात वावरत असून याचे गंभीर परिणाम भावी पिढीवर होणार आहेत.

    Criticism of Jayant Patil, conveniently sidestepping loan waiver by the rulers

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!