विशेष प्रतिनिधी
सांगली : सत्तेवर येण्याच्या आधी ज्यांनी कर्जमाफीची घोषणा केली त्यांनी सत्तेवर आल्यावर मात्र सोयीस्करपणे कर्जमाफीला बगल दिली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांनी केली.
पाटील म्हणाले, लाडक्या बहिणींना एकवेळ १५०० रुपयाचे २१०० रुपये पण दिले जातील पण ते पुढच्या निवडणुकीच्या तोंडावर दिले जातील. आता आम्ही कोणतीही घोषणा करू शकत नाही, कारण आमचा जोरात पराभव झाला आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर ३ लाख ६८९ शेतकऱ्यांना ३४१ कोटी ४८ लाख रुपये कर्जमाफी दिली होती. आपल्या जत तालुक्यातील १२ हजार ७१० शेतकऱ्यांना ६७ कोटी ६४ लाख रुपये कर्जमाफी दिली.
मोबाइलवरील व्हॉटसॲपचा वापर आता सार्वत्रिक झाला असून यावर येणारी माहिती केवळ गुन्हेगारी स्वरूपाची आणि राजकीय टीका-टिप्पणीचीच अधिक असते. मोबाइलवर बलात्काराच्या घटनेची माहिती घेत असतानाच, एखादी खून झाल्याची माहिती हाती येते, तर दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणीची माहिती मिळते, अशी खंत व्यक्त करत पाटील म्हणाले.
एक का अनेक लफडी या मोबाइलच्या माध्यमातून वापरकर्त्यांच्या मनावर आघात करत आहेत. यामुळे मूळ प्रश्न दुर्लक्षितच होत आहे. बेरोजगारीसारखी गंभीर समस्या आ वासून समोर असताना त्याकडे तरुण वर्गाचे दुर्लक्ष होत आहे. उद्याचे भविष्य हाती असताना तरुणाई आभासी जगात वावरत असून याचे गंभीर परिणाम भावी पिढीवर होणार आहेत.
Criticism of Jayant Patil, conveniently sidestepping loan waiver by the rulers
महत्वाच्या बातम्या
- Annamalai : अन्नामलाई म्हणाले- मी प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही; तामिळनाडूमध्ये भाजप नेतृत्वात बदल होईल
- Modi tells Yunus मोदींनी युनूसना सुनावले; बांगलादेशात निवडणुका घ्या, संबंधांना हानी पोहोचवणारी वक्तव्ये टाळा; हिंदूंच्या सुरक्षेवरही चर्चा
- Waqf bill : मुस्लिम संघटनांचा राहुल गांधी, नितीश कुमार, चंद्राबाबू यांच्याविरुद्ध संताप; पण पवारांनी त्यांच्यासोबत काय केले??