• Download App
    कोरोना संकट : नगर जिल्ह्याची वाढली चिंता ! आणखी ८ गावांमध्ये जाहीर केला लॉकडाऊनCorona crisis: Increased concern of Nagar district! Lockdown announced in 8 more villages

    कोरोना संकट : नगर जिल्ह्याची वाढली चिंता ! आणखी ८ गावांमध्ये जाहीर केला लॉकडाऊन

    जिल्हाधिकाऱ्यांच्या ६९ गावांमध्ये लॉकडाऊन या निर्णयाला खासदार सुजय विखे-पाटील यांनी कडाडून विरोध पुकारला आहे.Corona crisis: Increased concern of Nagar district! Lockdown announced in 8 more villages


    विशेष प्रतिनिधी

    अहदनगर : राज्यातील अनेक जिल्ह्यांत करोनाचा संसर्ग घटत असताना नगर जिल्ह्यात मात्र चिंता कायम आहे. नगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील १० पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या ६१ गावांत कडक लॉकडाऊन करण्यात आला होता .आता या ६१ गावांमध्ये आणखी ८ गावांना लॉकडाऊन जाहीर केला आहे.त्यामुळे लॉकडाऊन असलेल्या गावांची संख्या आता ६९ झाली आहे.



    या आठ गावांची पडली भर

    या आठ गावांमध्ये संगमनेर तालुक्यातील राजापूर, पिंप्री लौकी, आजमपूर, नेवासा तालुक्यातील चांदा, पारनेरमधील निघोज, वाडेगव्हाण, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी आणि शेवगावमधील वडुले बु. या गावांचा समावेश आहे.

    लॉकडाऊनवर प्रतिक्रिया

    जिल्हाधिकाऱ्यांच्या ६९ गावांमध्ये लॉकडाऊन या निर्णयाला खासदार सुजय विखे-पाटील यांनी कडाडून विरोध पुकारला आहे. तर, पारनेरसह अनेक ठिकाणच्या व्यापाऱ्यांनीही निर्बंधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

    Corona crisis: Increased concern of Nagar district! Lockdown announced in 8 more villages

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : RSS च्या कौतुकावरून दिग्विजय सिंह यांना राहुल गांधींनी फटकार, म्हणाले- तुम्ही चुकीचे केले

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- राहुल थकू नका, तुम्हाला तामिळनाडू-बंगालमध्येही हरायचे आहे, त्यांना विकासाचे राजकारण समजत नाही

    मुंबईत “ठाकरे राजा” काँग्रेसपेक्षा “उदार’ झाला; शरद पवारांच्या पक्षाला एकावर भोपळा दिला!!; मागितल्या 52, दिल्या 10!!