विशेष प्रतिनिधी
पुणे : गेल्या सहा वर्षांपासून कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी हे दोन्ही काँग्रेसच्या संपर्कात होते. पण त्यांनी कधी प्रवेश करण्याची भूमिका घेतली नाही. पण आता त्यांना काँग्रेसच्या विचारांची भूमिका मान्य केलेली दिसत आहे. आज काँग्रेस खाली खाली येत आहे. अशावेळी जर ही मंडळी येत काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे मत काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.
राजकारणात येण्यासाठी तरुणांना संधी दिली पाहिजे, असे सांगताना ते म्हणाले, मी राजकारणात येण्यापूर्वी सुशील कुमार शिंदे कोण हे कोणालाच माहीत नव्हते संधी घेतल्यानंतर सगळ्यांना माहित झालं की, सुशीलकुमार शिंदे कोण आहेत. म्हणून राजकारणात तरुणांना संधी द्यावी लागत नाही तर ती त्यांनी घायची असते, असे देखील शिंदे यांनी सांगितले.
राज्यात काँग्रेस शिवसेनेबरोबर जात असताना काँग्रेसने कॉमन मिनिमम प्रोग्रॅम स्वीकारला आहे. त्यामुळे काँग्रेसची हिंदुत्ववादी भूमिका नाही. ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांना योग्यरित्या चालवता आली नाही म्हणून तिन्ही पक्षांना कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर एकत्र यावं लागलं. केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर जनतेची सेवा करण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. असे शिंदे यांनी सांगितलं.
- सहा वर्षांपासून कन्हैया, जिग्नेश काँग्रेसच्या संपर्कात
- काँग्रेस पक्षातील प्रवेशामुळे पक्षाला उभारी
- काँग्रेस दिवसेंदिवस खाली खाली येत आहे.
- राजकारणात येण्यासाठी तरुणांना संधी द्यावी
- शिवसेनेबरोबर जाताना कॉमन मिनिमम प्रोग्रॅम
- हिंदुत्ववादाचा आणि काँग्रेसचा संबध नाही
Congress party coming down day by day
महत्त्वाच्या बातम्या
- अफझलखान वधाच्या पोस्टरवरून झालेल्या मिरज दंगलीचा खटला ठाकरे- पवार सरकारकडून मागे; १०६ जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- Letter to PM CM : पत्रास कारण की, आमचे दात येत नाहीयेत; चिमुकल्यांना मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांच भन्नाट उत्तर ; म्हणाले..
- शाळा सुरू करण्यापूर्वी लोकल प्रवासाचा प्रश्न सोडवा , शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी
- Mumbai 26/11 Terror Attack : अर्णब गोस्वामीच्या डिबेट शोमध्ये-पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच 26/11 हल्ला घडवून आणला- इम्रान खान यांच्या पक्षाची कबुली
- SWACHH BHARAT MISSION 2.0 : पंतप्रधान मोदींच्या हस्ते दोन मोहिमांचा शुभारंभ ; कोट्यवधी खर्च करुन नागरिकांना होणार मोठा फायदा ; वाचा काय आहे मोहिम…