• Download App
    RSS संघ प्रवक्त्यांच्या एका वाक्यावर काँग्रेस + राष्ट्रवादीवाले हुरळले; संघाचे अभिनंदन करून औरंगजेबाचे महिमा मंडन चालू ठेवले!!

    संघ प्रवक्त्यांच्या एका वाक्यावर काँग्रेस + राष्ट्रवादीवाले हुरळले; संघाचे अभिनंदन करून औरंगजेबाचे महिमा मंडन चालू ठेवले!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : संघ प्रवक्त्यांच्या एका वाक्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाले हुरळले; संघाचे अभिनंदन करून औरंगजेबाचे महिमा मंडन चालू ठेवले.

    – त्याचे झाले असे :

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक प्रतिनिधी सभेची बैठक बंगलोरमध्ये भरली. त्याची माहिती देण्यासाठी संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद प्रामुख्याने प्रतिनिधी सभेच्या बैठकीच्या अजेंड्याविषयी माहिती देण्यासाठी होती.

    सुनील आंबेकर यांनी प्रास्ताविकात त्या संदर्भात सगळी माहिती दिली आणि त्यानंतर प्रश्नोत्तरे घेतली. पत्रकार परिषद संपताना एका महिला पत्रकाराने त्यांना, “इज औरंगजेब रेलेव्हंट टुडे??”, असा प्रश्न विचारला. त्यावर सुनील आंबेकर यांनी, “नो, औरंगजेब इज नॉट रेलेव्हंट टुडे”, असे एकाच वाक्यात उत्तर दिले. त्यावेळी महिला पत्रकाराने औरंगजेबाच्या कबरी विषयी किंवा ती उखडून टाकण्याविषयी कुठल्याही नेमका प्रश्न विचारला नव्हता. त्यामुळे सुनील आंबेकर यांनी त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.

    पण तरी देखील सुनील आंबेकर यांच्या एकाच वाक्यावर काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीवाले हुरळले. त्यांनी संघाचे अभिनंदन केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संघाच्या भूमिकेचे स्वागत केले. औरंगजेब आज रेलेव्हंट नाही हे जर संघ म्हणत असेल तर त्यांच्याच परिवारातल्या इतर संघटनांनी त्यातून धडा घेतला पाहिजे, असे काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी अप्रत्यक्षपणे औरंगजेबाच्या कबरीचे समर्थन करून टाकले.

    Congress NCP SP half hurtedly praise RSS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये संभाव्य एन्ट्री, पुढच्या राजकारणातला धोका ओळखून आमदार सीमा हिरे यांचा विरोध; पण निर्णय काय होणार??

    Girish Mahajan : तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले विचारले तर काय होईल? गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर पलटवार

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!