• Download App
    राज्यात नागरिकांचा लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी प्रतिसाद ; ३८ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण । Citizens in the state respond to the second dose of the vaccine; 38 percent of citizens complete both doses

    राज्यात नागरिकांचा लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी प्रतिसाद ; ३८ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण

    नोव्हेंबर महिन्यात नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गर्दी करत असल्याचं समोर आलं आहे. Citizens in the state respond to the second dose of the vaccine; 38 percent of citizens complete both doses


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोना रुग्णांची घटती संख्या ही समाधानाची बाब आहे, मात्र अजूनही आपली कोरोना विरुध्दची लढाई संपलेली नाही. लसीकरण मोहिमेला गती देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार राज्यांच्या मदतीनं ‘हर घर दस्तक’ अभियान राबवले आहे.दरम्यान ऑक्टोबर महिन्यात लसीकरणाचा वेग काही प्रमाणात मंदावला असल्याचं दिसून आलं होतं.मात्र आता पुन्हा नोव्हेंबर महिन्यात नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गर्दी करत असल्याचं समोर आलं आहे.



    राज्यात आता नागरिक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी प्रतिसाद देत आहेत. गेल्या दहा दिवसात राज्यात जवळपास २४ लाख नागरिकांनी लसीचा पहिला डोस तर, ३० लाख नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याची नोंद आहे. दिवाळीपूर्वी अडीच ते तीन लाख नागरिकांना लस देण्यात आली.

    दिवाळीच्या दिवसांत नागरीक लसीकरणासाठी फारसं पुढे आले नाहीत. त्यामुळे लसीकरणाचा आकडा खाली आल्याचं म्हटलं जातंय. तर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लसीकरणाचा वेग सात लाखांपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे.सध्याच्या परिस्थितीत राज्यात सुमारे ७७ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ३८ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.

    Citizens in the state respond to the second dose of the vaccine; 38 percent of citizens complete both doses

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना