• Download App
    सिडको कर्मचाऱ्यांचा यंदा दिवाळी धमाका; 50000 रुपयांचा बोनस!! CIDCO employees' Diwali blast this year; Rs 50000 bonus 

    सिडको कर्मचाऱ्यांचा यंदा दिवाळी धमाका; 50000 रुपयांचा बोनस!!

    प्रतिनिधी

    मुंबई : दिवाळी निमित्ताने खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला जातो. नवी मुंबई येथील सिडको प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल 50000 रुपयांचा दिवाळी बोनस दिला आहे. बोनस जाहीर झाल्यानंतर सिडको कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून, पेढे वाढून आनंद साजरा केला.  CIDCO employees’ Diwali blast this year; Rs 50000 bonus

    महामंडळांमध्ये सर्वाधिक बोनस

    महामंडळांमध्ये हा सर्वाधिक बोनस असून सिडकोच्या या निर्णयाचे सिडको कर्मचारी संघटनेने स्वागत केले आहे. सिडको प्रशासनाच्या या निर्णयामुळे सर्व सिडको कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली असून सिडको कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आपला आनंद व्यक्त केलाय.

    ठाणे महानगरपालिकेचा 21,500 रुपयांचा बोनस 

    ठाणे महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये भरघोस 20 % वाढ करण्यात आली आहे.  गेल्या वर्षी 18000 रुपये बोनस दिला होता, तर या वर्षी यामध्ये 20 % वाढ झाली असून 21,500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. तसेच आशा सेविकांना यंदा 6000 रुपयांची भाऊबीज जाहीर करण्यात आली आहे.

    कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनेही कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 16,500 रुपये बोनस दिला होता. तर या वर्षी यामध्ये वाढ झाली असून 18,500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे.

    CIDCO employees’ Diwali blast this year; Rs 50000 bonus

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करायचा निर्धार!!

    पुरोहित संघातील 38 वर्षांची मक्तेदारी संपली, अध्यक्ष पदावरून सतीश शुक्लांची हकालपट्टी; चंद्रशेखर पंचाक्षरींकडे जबाबदारी; आता गोदावरी आरतीचा वाद संपण्याची अपेक्षा!!

    MNS-Thackeray : मनसे – ठाकरे गट युतीबाबत अमित ठाकरे यांचे सूचक वक्तव्य :दोन भावांनी बोललं पाहिजे, आम्ही बोलून काही फरक पडणार नाही