प्रतिनिधी
मुंबई : आमच्याकडे सगळ्यांचा कच्चा चिठ्ठा आहे, पण आम्हाला कामाने उत्तर द्यायचे आहे. परंतु, विरोधी पक्षांची टीका टिप्पणी सहन करायला, आरोप सहन करायला काही मर्यादा असतात, असा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत विरोधकांना दिला आहे. Chief Minister Eknath Shinde’s warning to the opposition in the Legislative Assembly
विधीमंडळ अधिवेशन काळात दररोज विरोधक एकनाथ शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरून वेगवेगळ्या घोषणा देत होते. 50 खोके, एकदम ओके!!, 50 खोके खाऊन माजलेत बोके अशा या घोषणा होत्या. याच मुद्द्यावरून सर्व विरोधकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमचा सगळ्या कच्चा आमच्याकडे आहे, अशा शब्दांमध्ये सूचक इशारा दिला आहे.
विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी वाढली आहे. रात्री ३.३० पर्यंत मी काम करतो, पुन्हा सकाळी ७.३० पासून कामकाज सुरू होते. पण, विरोधक चांगल्याला चांगले म्हणत नाहीत. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले, तर महाराष्ट्राच्या विकासाची गती आणखी वेगवान होईल.
स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढवणार
पाऊस आणि इतर हवामान विषयक बाबींचे मोजमाप करण्यासाठी यापूर्वी प्रत्येक २,४०० महसूल मंडळात एक स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलेले आहे. ही संख्या अपुरी असल्यामुळे स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज मिळेल व विमा दावे वेगाने निकाली काढता येतील.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
अंबाजोगाई नगर परिषदेतील चार अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी
‘त्या’ मृत गोविंदाच्या कुटूंबियांना तत्काळ दहा लाखांची मदत
गोंदिया, भंडारा प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करणार
मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रीटचे करणार
Chief Minister Eknath Shinde’s warning to the opposition in the Legislative Assembly
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात पुन्हा जलयुक्त शिवार अभियान सुरू होणार, 25 हजार दुष्काळग्रस्त गावांना मिळणार मदत
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- सरपंच, नगराध्यक्षाच्या थेट जनतेतून निवडीचे विधेयक मंजूर, मुख्यमंत्री शिंदे यांनी मांडले होते विधेयक
- OBC आरक्षणाची सुनावणी ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली ; राज्यातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक