• Download App
    छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक धर्मवीर; अजितदादांना संभाजीराजेंनी सुनावले Chhatrapati Sambhaji Maharaj is a swaraj raksha Dharmaveer

    छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक धर्मवीर; अजितदादांना संभाजीराजेंनी सुनावले

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन वादळी स्वरूप आले असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत वादग्रस्त वक्तव्य केले. छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्य रक्षक होते, धर्मवीर नव्हते, असे म्हटले. त्यावर आता माजी खासदार संभाजी राजे यांनी अजित पवार यांना चुकीचे ठरवले. छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्य रक्षक होतेच, तसेच ते धर्मवीरही होते. तसे अनेक पुरावे अस्तित्वात आहेत, असे संभाजी राजे पत्रकार परिषदेत अजितदादांना सुनावले आहे. Chhatrapati Sambhaji Maharaj is a swaraj raksha Dharmaveer

    काय म्हणाले संभाजी राजे? 

    छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणीसाहेब यांनी या हिंदवी स्वराज्याचे संरक्षण केले. त्याबद्दल दुमत नाही. संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते हे निश्चित आहे. तसेच संभाजी महाराजांनी धर्माचेही रक्षण केले, हे कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर आहेतच, त्यापाठोपाठ ते धर्मरक्षकही आहेत. हे म्हटले तर काही चुकीचे होणार नाही. त्यामुळे तुम्ही इतिहासाची मोडतोड करू नका, असे संभाजी छत्रपती यांनी सांगितले.



    अजित पवारांनी कोणता संदर्भ देऊन ते विधान केले, ते त्यांनीच सांगावे. कोणत्याही ऐतिहासिक घटनेवर भाष्य करताना त्यावर अभ्यास केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नका, अशी माझी सर्व पुढाऱ्यांना विनंती राहील, असेही संभाजी राजे म्हणाले. सभागृहात बोललेल्या विधानाला अधिकृतपणा येतो. सभागृहाच्या बाहेर काहीही बोलले जाते, सभागृहात मात्र अभ्यास करूनच बोलावे लागते. मग कोणताही विषय असो, असेही संभाजी राजे म्हणाले.

    Chhatrapati Sambhaji Maharaj is a swaraj raksha Dharmaveer

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    रोहित पवारांनी तेलगू देशम पार्टीला आणि भाजपला ओढले संशयाच्या जाळ्यात; पत्रकार परिषदेतून आरोप आणि दाव्यांच्या फैरी!!

    Himanta Biswa Sarma : हिमंता म्हणाले-2014 मध्ये सोनिया मला मुख्यमंत्री बनवायला तयार होत्या; राहुल यांनी नेत्यांना फोन करून परिस्थिती बदलली

    Congress-NCP : राज्यातील मुस्लिमांना 5% आरक्षण देण्याचा 2014चा निर्णय अखेर रद्द; 2014 मध्ये तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने घेतला होता निर्णय