विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधान परिषदेत भारतीय जनता पार्टीचा सभापती असावा, असा आग्रह भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा असून, यासाठी महायुतीतील 11 घटक पक्षांची चर्चा करावी लागेल, सर्वांशी चर्चा करून एकत्रित निर्णय करू, असे ते म्हणाले. नागपूर येथे ते वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींची संवाद साधत होते.Chandrasekhar Bawankule votes for BJP’s candidacy for Legislative Council Chairmanship; BJP core group meeting in Mumbai today
शुक्रवारी व्हायरल झालेल्या लेटरहेडवरील पत्राबाबत बावनकुळे म्हणाले की, भाजपा कोअर समितीच्या बैठकीत वीसहून अधिक नावांवरती चर्चा झाली आहे. कुणीतरी खोडसाळपणा केला आहे. ते पत्र नाहीच; ते एक फक्त पान आहे. कुणीतरी त्यावर ठप्पा मारला आहे. त्यामुळे त्याला काही अर्थ नाही. त्यात कुठलाही प्रोटोकॉल नाही. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड विधानपरिषदेसाठी चांगले उमेदवार देईल. महाराष्ट्राच्या विकासाकरिता चांगली नावे महाराष्ट्र विधान परिषदेत दिसतील. निवडणुकीसाठी काही लोकांना अंदाज बांधतात त्यातून याद्या तयार होतात असा टोलाही त्यांनी लगावला. नावे जरी मेरिटवर असली तरी त्या लिस्टचा आधार काहीच नाही.
आज महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव व अश्विनी वैष्णव कोअर ग्रुपची बैठक घेणार आहेत, त्यानंतर निवडणूक व्यवस्थापन समिती बैठक असून महाराष्ट्राच्या निवडणुकीत समोर कसे जायचे यावर चर्चा होईल.
14 तारखेला पुणे येथे राज्याची विस्तृत कार्यकारणी बैठक होईल. त्यात राज्यातील साडेचार हजार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करतील, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली.
ठाकरेंना बजेटचा अभ्यास शिकावा
मुख्यमंत्री असताना बजेट समजत नाही असे म्हणणारे उद्धव ठाकरे आता बजेटवर बोलू लागले आहेत. त्यांना बजेट मतितार्थ समजला असता तर त्यांनी बजेटवर अभ्यास करून प्रतिक्रिया दिली असती. चांगल्या बजेटला, कर्तव्यनिष्ठ सरकारला किंवा टोमणे मारायचे व विरोधासाठी विरोध करायचा. उद्धव ठाकरे यांना बजेटचा अभ्यास करणे शिकावे लागेल. महाराष्ट्रातील जनतेच्या विकासाकरिता महायुती सरकार काम करीत आहे.
Chandrasekhar Bawankule votes for BJP’s candidacy for Legislative Council Chairmanship; BJP core group meeting in Mumbai today
महत्वाच्या बातम्या
- ICC T20 World Cup : इंग्लडला 68 धावांनी पराभूत करत भारताची विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक!
- पेपरफुटी वरून विरोधकांचा दोन्ही सरकारांवर हल्लाबोल, पण महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारच्या काळात झाल्या तरी किती पेपरफुटी??
- गुंडांशी संबंध नकोत, म्हणून अजितदादांनी भरली होती तंबी, पण त्यांच्याच कार्यकर्त्यांनी ती खुंटीला टांगली!!
- केजरीवाल सरकारला आणखी एक मोठा झटका, उपराज्यपालांनी ‘ही’ समिती केली बरखास्त