• Download App
    सामूहिक प्रार्थना करून तुळशी विवाहास प्रारंभ वर्ध्यात मंगलाष्टकांचे सुमधुर सूर उमटले|By collective prayer Tulsi marriage started

    WATCH : सामूहिक प्रार्थना करून तुळशी विवाहास प्रारंभ वर्ध्यात मंगलाष्टकांचे सुमधुर सूर उमटले

    विशेष प्रतिनिधी

    वर्धा : वर्धा शहराच्या अनेक भागात सामुहिक तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दर वर्षी कार्तिक एकादशीपासून या तुऴशी विवाहांना सुरुवात होते. ग्रामीण भागात या तुळशी विवाहाला विशेष महत्त्व असते.By collective prayer Tulsi marriage started

    कार्तिक महिन्यात तुळशी विवाहानंतरच गावोगावच्या विवाह समारंभाना सुरुवात होते. भारतीय संस्कृती तसेच सामाजिक बांधिलकी जोपसण्यासाठी वर्धा शहरातील देशमुख ले आऊट भागात मागील १० वर्षा पासून सामूहिक तुळशी विवाहाची ही परंपरा सातत्याने सुरु आहे.



    तुळशी समोर मंगलाष्टकांना सुरवात होते. मंगलाष्टकं पूर्ण होताच आरती करून हे विवाह समारंभ पार पडले, अशी घोषणा पंडितांकडून केली जाते. विशेष बाब म्हणजे वधु पक्षा कडून लग्नाच्या आयोजनाची तसेच जेवणाची तयारी केली जाते.

    •  सामूहिक प्रार्थना करून तुळशी विवाहास प्रारंभ
    • मंगलाष्टकांचे सुमधुर सूर उमटले
    • कार्तिक एकादशीपासून या तुऴशी विवाहांना सुरुवात
    •  देशमुख ले आऊट भागात १० वर्षा पासून सामूहिक तुळशी विवाहाची ही परंपरा
    • विवाहानंतर समूह भोजनाची परंपरा कायम

    By collective prayer Tulsi marriage started

    Related posts

    नागपूरच्या ईश्वरी पांडेने पार केली पाल्कची समुद्रधुनी; जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!!; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा