• Download App
    पण झेंडू उत्पादकांची दिवाळी कडूच ; दर निम्याने घटले|but the Diwali of marigold growers is bitter; Rates dropped by half

    पण झेंडू उत्पादकांची दिवाळी कडूच ; दर निम्याने घटले

    यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दिवाळीसाठी फुले राखून ठेवली होती. त्यामुळे बाजारात मागणीपेक्षा आवक जास्त होत आहे. त्यामुळे दर घटले आहेत.but the Diwali of marigold growers is bitter; Rates dropped by half


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी बाजारात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत फुलांचे दर निम्याने घटले आहेत. त्यामुळे झेंडू उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.आत्ता थेट मार्केटला मोठ्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांना बुधवारी २० ते ५० रुपये, तर छोट्या आकाराच्या फुलांना १० ते २० रुपये किलो भाव मिळाला.

    किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीच्या झेंडूच्या फुलांची ५० ते ८० रुपये किलोने विक्री केली जात आहे.तसेच शेवंतीच्या फुलांना २० ते ४५ रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांची दुप्पट आवक आहे, तर ५० टक्क्यांनी दरात घट झाली आहे.



    फुले सध्याचे भाव मागील वर्षीचे भाव

    १)मोठा झेंडू सध्याचा भाव मागील वर्षीचे भाव
    २० ते ५० रुपये १०० ते १२० रुपये

    २)छोटा झेंडू १० ते २० रुपये. ४० ते ७० रुपये

    ३) शेवंती १० ते ४५ रुपये. २५० ते ३०० रुपये

    पुणे, सातारा, सोलापूर, बीड, तसेच कर्नाटकातूनही झेंडूच्या फुलांची आवक झाली आहे .तर शेवंतीची यवत, माळशिरस येथून आवक होत आहे. फुलांना शहरासह, उपनगर भागातून मागणी असते.मागील वर्षी लॉकडाउनमुळे मंदिरे व धार्मिक स्थळेही बंद होते.

    त्यामुळे फुलांची आवकही मर्यादित होती. दरम्यान यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दिवाळीसाठी फुले राखून ठेवली होती. त्यामुळे बाजारात मागणीपेक्षा आवक जास्त होत आहे. त्यामुळे दर घटले आहेत. आवक अशीच राहिल्यास दरही टिकून राहतील, असे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.

    but the Diwali of marigold growers is bitter; Rates dropped by half

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ