• Download App
    बंधुभावाचा संदेश, हिंदू व मुस्लिम धर्मीय रिक्षा चालकांनी एकत्रिपणे केले कुराण व हनुमान चालिसाचे पठण|Brotherhood message, Hindu and Muslim rickshaw pullers recite Quran and Hanuman Chalisa together

    बंधुभावाचा संदेश, हिंदू व मुस्लिम धर्मीय रिक्षा चालकांनी एकत्रिपणे केले कुराण व हनुमान चालिसाचे पठण

    विशेष प्रतिनिधी

    पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमध्ये हिंदू व मुस्लिम धर्मीय रिक्षा चालकांनी एकत्र येत कुराण व हनुमान चालिसाचे एकाच कार्यक्रमात पठण केले. या द्वारे या रिक्षा चालकांनी हिंदू-मुस्लिम एकता आणि बंधुभावाचा संदेश दिला.
    देशभरात पवित्र रमजान आणि राम नवमी मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे.Brotherhood message, Hindu and Muslim rickshaw pullers recite Quran and Hanuman Chalisa together

    काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भात भाषण केलं होते. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्याचे पडसाद हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात पडायला सुरुवात झाली. मात्र, असे असताना पिंपरी-चिंचवडमधील रिक्षाचालकांनी धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी कुराण आणि हनुमान चालिसाचे पठण करून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला.



    सध्या मुस्लिम धमीर्यांचा रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. रविवारी राम नवमीचा दिवस होता. दोन्ही धर्मांतील सणाचं पावित्र्य आणि आदर राखत काल रविवारी हिंदू व मुस्लिम बांधवांनी हनुमान चालीसा आणि कुराण मधील सुराह अल फतेह या आयतींचे एकत्र पठण केले. हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्यांवरून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ नये या दृष्टीने रिक्षाचालकांनी केलेल्या या कृतीचं सर्वत्र कौतुक केले जात आहे.

    Brotherhood message, Hindu and Muslim rickshaw pullers recite Quran and Hanuman Chalisa together

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Padalkar’s : पडळकरांची मोठी मागणी- लव्ह जिहादविरोधी कायदा संभाजी महाराजांच्या नावाने करा

    Ajit Pawar NCP इकडे महाराष्ट्रात काका – पुतण्यांच्या पक्षांच्या ऐक्याची निष्फळ चर्चा; तिकडे नागालँड मध्ये 7 आमदारांनी अजितदादांचा आख्खा पक्षच गुंडाळला!!

    Ajit Pawar NCP : अजितदादांना धक्का देत नागालँडमधील 7 आमदारांनी साथ सोडली; सत्ताधारी पक्षातल्या विलीनीकरणाला मान्यताही मिळाली!!