• Download App
    BREAKING NEWS : GOOD DECISION-आता पोलिसांनाही Work From Home; महाविकास आघाडी सरकारचा कौतुकास्पद निर्णय । BREAKING NEWS : GOOD DECISION- Now From Police Work From Home; Admirable decision of Mahavikas Aghadi government

    BREAKING NEWS : GOOD DECISION-आता पोलिसांनाही Work From Home; महाविकास आघाडी सरकारचा कौतुकास्पद निर्णय

    • राज्यात आतापर्यंत 9510 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून 123 जणांचा मृत्यू झाला आहे.
    • मुंबईत गेल्या 24 तासांत 71 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
    • यामुळे गृहमंत्रालयाने पोलिसांसाठी ‘वर्क फ्रॉम होमचा मोठा निर्णय घेतला आहे. BREAKING NEWS: GOOD DECISION- Now From Police Work From Home; Admirable decision of Mahavikas Aghadi government

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात कोरोना वाढतआहे. त्यामुळे चिंता पुन्हा वाढली आहे. अशात गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांप्रमाणे आता राज्यातील पोलिसांना देखील ‘वर्क फ्रॉम होम’ (Work Form Home) करता येणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.महाविकास आघाडी सरकारने घेतलेला हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे.

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काय म्हणाले?

    मुंबईसह राज्यातील पोलिसांना देखील कोरोना व्हायरसचा सामना करावा लागत आहे. पोलिसांनी नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास कर्तव्यावर हजर राहावे लागते. त्यामुळे त्यांना देखील कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 71 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे गृहमंत्रालयाने पोलिसांसाठी ‘वर्क फ्रॉम होमचा मोठा निर्णय घेतला आहे. 55 वर्षांवरील पोलिस कर्मचाऱ्यांनी ड्यूटीवर येण्याची आवश्यकता नाही. ते वर्क फ्रॉम होम करु शकतात. याबाबत आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी देखील कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

    BREAKING NEWS : GOOD DECISION- Now From Police Work From Home; Admirable decision of Mahavikas Aghadi government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ