• Download App
    ''...हा एक मोठा विनोदच म्हणावा लागेल'' भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा! BJP responded to Uddhav Thackerays criticism

    ”…हा एक मोठा विनोदच म्हणावा लागेल” भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

    (संग्रहित)

    ”…त्यामुळे त्यांनी लोकशाही वाचवण्याच्या गप्पा मारू नयेत.” असंही भाजपाने म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना ( ठाकरे गट ) आणि समाजवादी विचारांच्या पक्षांची बैठक काल ( १५ ऑक्टोबर ) पार पडली. यावेळी बोलताना  उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. ज्या टीकेला  भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर दिले गेले आहे. BJP responded to Uddhav Thackerays criticism

    भाजपाने म्हटले आहे की, ”घराणेशाहीच्या जीवावर पद उपभोगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी  यांनी आज कथित समाजवाद्यांसोबत येऊन लोकशाही वाचवण्याच्या गप्पा मारल्या. हा एक मोठा विनोदच म्हणावा लागेल. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली होती. त्यामुळे त्यांनी लोकशाही वाचवण्याच्या गप्पा मारू नयेत.” 

    याशिवाय, ”सत्तेत असताना अडीच वर्षे जे उद्धव ठाकरे घरात बसून होते ते उद्धव ठाकरे मोदीजींनी गेल्या साडेनऊ वर्षांत काय केलं? असा प्रश्न विचारत आहेत आणि होऊ दे चर्चा म्हणत आहेत. उद्धव ठाकरे यांना चर्चा करायचीच असेल तर १०० कोटी वसुली, कोविड काळातील घोटाळे, पत्राचाळ घोटाळा, वाझे की लादेन?, यावर एकदा चर्चा होऊन जाऊ द्या.” असं म्हणत भाजपाने उद्धव ठाकरेंच्या टीकेवर पलटवार केला आहे.

    काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे? –

    उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेना आणि भाजपाची युती तोडण्याचं कारण काय होतं? आता शिवसेना आणि समाजवादी पक्ष एकत्र आल्यानं सवाल उपस्थित केले जातील. जर, गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी खेळांडूवर भाजपा फुलांचा वर्षांव करत असेल मग, मी शिवसेना म्हणून समाजवाद्यांशी बोलू शकत नाही का? तुम्हाला गाडण्यासाठी आमच्यातील मतभेद गाडून टाकले आहेत. काय बोलता बोला?”

    BJP responded to Uddhav Thackerays criticism

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Solapur EVM : सोलापुरात ढाब्यावर सापडलेल्या ईव्हीएमप्रकरणी आयोगाची कारवाई; राखीव ईव्हीएम मतदानातील नसल्याचा खुलासा

    ZP elections results : भाजपच नंबर 1; अजितदादांच्या राष्ट्रवादीला सहानुभूतीचा फायदा; 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता!!

    अजितदादांची पायाभरणी आणि नंतरची सहानुभूती यामुळे पुणे जिल्ह्यात चालली राष्ट्रवादीची हवा, भाजपनेही दिला होता “बाय”!!