वृत्तसंस्था
मुंबई : ”बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता.” अशी जोरदार टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे – पवार सरकारवर केली. Bjp mla gopichand padalkar criticizes thackeray government over recruitment
आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून ठाकरे सरकारवर पदभरती मुद्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणतात, “ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे स्वप्नील लोणकरला जीव गमवावा लागला होता. त्यांनतर सरकारने ना नियुक्त्या दिल्या ना पदभरती केली.
#आघाडी_सरकारमध्ये अनेक विभागात ११,३५१ पद रिक्त असताना मात्र यांनी #MPSC कडे फक्त ४,२६४ पदांची मागणी केली. स्वतःच्या मुलांना आमदार-खासदार करण्यापुरते प्रस्थापितांकडे रिक्त पदं आहेत. बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) September 25, 2021
आतातर वेगवेगळ्या २० विभागात ११ हजार ३५१ पद रिक्त असताना, लोकसेवा आयोगाकडं केवळ ४ हजार २६४ रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी केली आहे. स्वतःच्या मुलांना आमदार-खासदार करण्यापुरते प्रस्थापितांकडे रिक्त पदं आहेत. बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
कोविडच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागात विविध श्रेणीतील २५०० च्या आसपास पदं रिक्त होती. मात्र अमित देशमुख यांनीपद भरतीची मागणी सरकारकडे केली नाही. हीच परिस्थिती अनेक खात्यांची आहे. प्रशासन आणि सरकार यांच्यात कसलाही ताळमेळ नाही, असे पडळकर म्हणाले.
Bjp mla gopichand padalkar criticizes thackeray government over recruitment
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : कम्युनिस्ट कन्हैया होणार काँग्रेसी, जिग्नेश मेवानीसह 28 सप्टेंबरला होणार प्रवेश सोहळा
- १२००० कोटी विरूद्ध १.३४,४९९ कोटी; माजी कृषिमंत्र्यांना केंद्रीय सहकार मंत्र्यांनी दाखविला कृषी बजेटचा “आरसा”
- जाणून घ्या देशात पहिल्या आलेल्या युपीएससी टॉपर शुभम कुमार ची कहाणी
- सहकार क्षेत्रात पारदर्शकतेला महत्त्व द्या; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांचे पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनात परखड बोल
- जम्मू -काश्मीरवर घोंगावतेय तालिबानचे हिरवे संकट; सैन्याच्या तुकड्या वाढविण्याबरोबरच पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घेण्याची गरज