प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, ड्रग्जचे समर्थन, व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण याबाबत जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी राज्यभर तब्बल 20 हजार सभांचा धडाका उडवत भाजप ठाकरे – पवार सरकारविरुद्ध एल्गार पुकारणार आहे. भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याची माहिती दिली आहे.BJP is holding 20,000 rallies across Maharashtra
अमरावती, नांदेड आणि मालेगावच्या दंगलीची मास्टरमाईंड रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत करण्यात आली, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
भाजपाच्या कार्यकारिणी बैठकीत राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाबाबत एक ठराव मांडण्यात आला. राज्यातील विविध घटकांवर महाविकास आघाडीने कसा अन्याय केला आहे, हे स्पष्ट करणारा राजकीय ठराव मांडण्यात आला.
बलात्कार, ड्रग्ज, भ्रष्टाचार, व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न याबाबत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी पक्षातर्फे राज्यभर सभा घेण्यात येतील. तसंच डिसेंबर महिन्यात मुंबईत मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करतील, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
एसटी कामगारांच्या संपाला कार्यकारिणीनै पाठिंबा दिला. भाजपा नेते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर कामगारांचे नेतृत्व करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि अन्य सुविधा देणे शक्य आहे व त्यासाठी राज्य सरकारने आर्थिक बोजा सहन केला पाहिजे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
त्यांनी सांगितले की, त्रिपुरात मशीद पाडण्याची घटना घडली नाही तरीही अफवेच्या आधारे मालेगाव, नांदेड, अमरावतीत षडयंत्र रचून दंगल घडविण्यात आली. 400 जणांच्या मोर्चाला परवानगी असताना 15000 ते 40000 हजार लोक रस्त्यावर आले. या दंगलीत रझा अकादमीचा हात आहे. पण असा अन्याय हिंदू समाज सहन करणार नाही. सरकारने हे हल्ले थांबविले नाहीत तर लोकांना संघटित होऊन रस्त्यावर उतरावे लागेल आणि लोकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया सरकार रोखू शकत नाही.
BJP is holding 20,000 rallies across Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी