• Download App
    उल्हासनगर येथील भाजप नगरसेवक अजित गुप्ता यांचा मृत्यूBJP corporator Ajit Gupta from Ulhasnagar died in accident

    उल्हासनगर येथील भाजप नगरसेवक अजित गुप्ता यांचा मृत्यू

    प्रतिनिधी

    उल्हासनगर : महापालिकेतील भाजपचे तरुण नगरसेवक अजित उर्फ पप्पु गुप्ता यांच्या कारला शुक्रवारी (दि. 12) रात्री मुरबाड रोडवरील पाचवा मैल येथे अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या सोबत कारमध्ये असलेला त्यांचा मित्र गंभीर जखमी झाला.BJP corporator Ajit Gupta from Ulhasnagar died in accident

    त्यांच्या पश्चात वडील व माजी नगरसेवक प्रभुनाथ गुप्ता, आई, पत्नी, मुले, भाऊ असा मोठा परिवार आहे. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

    उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील सुभाषनगर परिसरातून अजित गुप्ता साई पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते. महापौर पदाच्या निवडणुकीत साई पक्ष भाजपमध्ये समाविष्ट झाला.

     

    शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान नगरसेवक गुप्ता हे मित्रासोबत मुरबाड वरून उल्हासनगरला घरी येत होते. पाचवा मैल येथील एका धोकादायक वळणावर पिकअप टेम्पो व कारची जोरदार धडक झाली. यात गुप्ता आणि त्यांचा मित्र गंभीर जखमी झाले. पिकअप टेम्पो मधील दोघेही जखमी झाले. सर्वांना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी अजित गुप्ता यांना मृत घोषित केले.अन्य जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    शहरातील सुभाषनगर, पंजाबी कॉलनी परिसरात कट्टर पप्पू कलानी समर्थक असलेल्या प्रभुनाथ गुप्ता यांचे राजकीय वर्चस्व आहे. मात्र तिकीट वाटपावरुन त्यांचे कलानीं सोबतचे संबंध बिघडले. त्यामुळे गुप्ता यांनी स्थानिक साई पक्षात प्रवेश घेतला. प्रभुनाथ गुप्ता हे त्यांच्या पत्नीसह याच परिसरातून नगरसेवक पदी निवडून आले. गेल्या निवडणुकीत मुलगा अजित नगरसेवक पदी निवडून आला होता.

    BJP corporator Ajit Gupta from Ulhasnagar died in accident

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये संभाव्य एन्ट्री, पुढच्या राजकारणातला धोका ओळखून आमदार सीमा हिरे यांचा विरोध; पण निर्णय काय होणार??

    Girish Mahajan : तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले विचारले तर काय होईल? गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर पलटवार

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!