• Download App
    BJP-Congress Legislative Council elections unopposed as decided

    भाजप – काँग्रेस यांचे ठरल्यानुसार विधान परिषद निवडणूक बिनविरोध

    प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई महापालिकेतून विधान परिषदेत दोन सदस्यांच्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सुनील शिंदे आणि भाजपकडून राजहंस सिंह यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांनीही काँग्रेस पुरस्कृत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत चुरस निर्माण केली होती. पण, सुरेश कोपरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे मुंबईतील विधान परिषदेच्या दोन जागा आता बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.BJP-Congress Legislative Council elections unopposed as decided

    अर्थात या आधीच भाजप तसेच काँग्रेस नेत्यांचे ठरल्यानुसार ही निवडणुक बिनविरोध होत आहे. काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर भाजपने माघार घेतली होती. त्या बदली काँग्रेसने माघार घेतली आहे. देवेंद्र फडणवीस तसेच नाना पटोले यांची चर्चा झाली होती.


    विधान परिषदेसाठी शिवसेनेत अंतर्गत स्पर्धा; सचिन अहिर, वरुण सरदेसाई, सुनील शिंदे की किशोरी पेडणेकर?


    अपक्ष उमेदवार सुरेश कोपरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे राजहंस सिंग तर, शिवसेनेचे सुनील शिंदे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपने एका अमराठी उमेदवाराला उमेदवारी दिली. दुसरीकडे सुनिल शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघ सोडला होता आणि त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली जाईल, असे आश्वासन देण्याच आले होते. अखेर सेनेकडून सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली.

    खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने माघार घेत ही निवडणूक बिनविरोध केली होती. तसेच सातव यांच्या पत्नीचीही विधान परिषदेवर बिनविरोध निवड झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसने दबावतंत्र राबवण्यासाठी आपल्या उमेदवाराला अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे केले होते. त्यामुळेच कोपरकरांनी अपेक्षेप्रमाणे अर्ज मागे घेतला आहे.

    BJP-Congress Legislative Council elections unopposed as decided

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?