• Download App
    भिवंडी : कोळशाचा कंटेनर झोपडीवर पलटला , 3 मुलींचा मृत्यू Bhiwandi: Coal container overturned on hut, 3 girls killed

    भिवंडी : कोळशाचा कंटेनर झोपडीवर पलटला , ३ मुलींचा मृत्यू

     

    हायड्रॉलिक प्रेशर जॅक अचानक तुटल्यानं कोळशानं भरलेला हा कंटेनर वीटभट्टी मजुराच्या झोपडीवर कोसळला.Bhiwandi: Coal container overturned on hut, 3 girls killed


    विशेष प्रतिनिधी

    भिवंडी : भिवंडी तालुल्यातील टेंभिवली गावात एक धक्कादायक घटना घडली आहे.एक कोळशानं भरलेला कंटनेर वीट भट्टी मजुराच्या घरावर पलटी झाल्यानं या घरातील तीन मुलांचा यामध्ये दुर्देवी मृत्यू झाला आहे.दरम्यान स्थानिकांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरु केलं.तसेच भिवंडी पोलीस या दुर्घटनेचा तपास करत आहेत.

    पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार,

    बालाराम वळवी हे आपल्या झोपडीवजा घरात कुटुंबासह झोपेत असताना त्यांच्या घराशेजारी वीटभट्टीसाठी लागणारा कोळशाचा कंटेनर खाली केला जात होता. याला वळवी यांनी अनेकदा विरोध केला होता. परंतू त्यांचा विरोध डावलून असे कंटेनर त्यांच्या घराशेजारील जागेतच उतरवला जात होता. वीटभट्टीवर लागणारा कोळसा कंटेनर रिकामा करत होता.


    Coal Shortage : कोळशाच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रात वीज कमी पडू देणार नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची ग्वाही, ग्राहकांना काटसरीने वीज वापराचे आवाहन

    दरम्यान त्याचा हायड्रॉलिक प्रेशर जॅक अचानक तुटल्यानं कोळशानं भरलेला हा कंटेनर वीटभट्टी मजुराच्या झोपडीवर कोसळला.तसेच या भीषण दुर्घटनेत या घरात राहणारे सर्वजण कोळशाच्या ढिगाऱ्यात गाडले गेले. मात्र, यामध्ये तीन मुलींची दुर्दैवी मृत्यू झाला.

    तसेच स्थानिकांनी वळवी व त्यांची पत्नी आणि एका लहान चिमुकल्याला बाहेर काढण्यात यश मिळवलं. संतप्त जमावाने कंटेनरची तोडफोड केली आहे, याप्रकरी सध्या भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर वीटभट्टी मालक, ट्रक मालक यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    Bhiwandi: Coal container overturned on hut, 3 girls killed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ