मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती देणे, अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी पुरवणे आदी गोष्टी होऊ शकलेल्या नाहीत, असेही ते म्हणाले.Beed: Farmers’ issues are not resolved immediately; After Diwali, farmers will form a morcha in the district – MLA Vinayak Mete
विशेष प्रतिनिधी
पुणे : शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत . दरम्यान बीड जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांमध्ये दोनशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.परंतु राज्य सरकारमधील एकाही मंत्र्याला त्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही.
शेतकरी मोर्चा काढणार
बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामेदेखील गांभीर्याने करत नाहीयेत. त्यामुळे केवळ चार ते पाच हजारांची मदत शेतकऱ्यांना दिली जात आहे.त्यामुळे मेटे म्हणले की,जर शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सुटले नाहीत तर दिवाळीनंतर लगेचच बीड जिल्ह्यात शेतकरी मोर्चा काढण्यात येईल.
आर्यन खानला वाचविण्यात सरकारला रस
सरकारला फक्त आर्यन खानला वाचविण्यात त्यांना रस आहे, अशी टीका आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत केली.मराठा आरक्षणाच्या बाबतीत वेळोवेळी शब्द देऊनही सरकार चालढकल करत आहे.
मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती देणे, अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी पुरवणे आदी गोष्टी होऊ शकलेल्या नाहीत, असेही ते म्हणाले.यावेळी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, प्रदेश प्रवक्ता तुषार काकडे, शहराध्यक्ष भरत लगड, बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते.
Beed: Farmers’ issues are not resolved immediately; After Diwali, farmers will form a morcha in the district – MLA Vinayak Mete
महत्त्वाच्या बातम्या
- देशप्रेमाची शिक्षा! पाकिस्तानच्या विजयानंतर जल्लोष करणाऱ्यांना विरोध केला म्हणून चार विद्यार्थ्यांना काढले होस्टेलबाहेर
- वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांच्या मध्यस्ताला सीबीआयने ठोकल्या बेड्या
- ममतांचे नेमके इरादे काय? त्या काँग्रेस आणि गांधी कुटुंबाला पर्यायी नेतृत्व ठरू शकतील?
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका