• Download App
    यशोमती ठाकूर यांच्यामुळे ४८ जणांचा रोजगार वाचला। Because of Yashomati Thakur 48 Workers jobs were saved in Amravati

    यशोमती ठाकूर यांच्यामुळे ४८ जणांचा रोजगार वाचला

    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : सलग आठ दिवस कामावर गैरहजर राहिल्याप्रकरणी ४८ कामगारांना कामावरून काढून टाकले होते. परंतु, अमरावतीच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे या कामगारांचा रोजगार वाचला आहे. Because of Yashomati Thakur 48 Workers jobs were saved in Amravati

    अमरावती लगतच्या नांदगाव पेठ MIDCमध्ये काँग्रेसच्या कामगार सेलचे अध्यक्ष पंकज शेंडे यांच्या नेतृत्वाखाली काही कामगारांचे आंदोलन सुरू होते. पालकमंत्री यशोमती ठाकूर या आंदोलनाच्या ठिकाणी पोचल्या. सुदर्शन जिन्स कंपनीने ४८ स्थानिक कामगारांना कामावरुन काढून टाकल्याने हे आंदोलन सुरू असल्याचे सांगण्यात आले.

    या आंदोलनाची तातडीने दखल घेत मंयशोमती ठाकूर यांनी कंपनी प्रशासनाला आंदोलन ठिकाणी बोलावले. तसेच ८ दिवस कामावर आले नाही म्हणून ४८ कामगारांना कामावरुन काढता येणार नाही, असे बजावले. तसेच या कामगारांना कामावर परत घेण्याची सूचना केल्या. कंपनीने कामगार कायद्याचे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले. कामगारांनाही अशाप्रकारे सुटी घेणे चुकीचे असल्याचे सांगत यशोमती ठाकुर यांनी वादावर आंदोलनाच्या ठिकाणीच तोडगा काढला.

    • यशोमती ठाकूर यांच्यामुळे ४८ जणांना पुन्हा रोजगार
    • आठ दिवस गैरहजर राहिल्याने कामगारांना काढले
    • नांदगाव पेठ MIDC तील एका कंपनीतील प्रकार
    • काँग्रेसच्या कामगार सेलचेही कामगारांसाठी आंदोलन
    • आंदोलनस्थळी पोचून ठाकूर यांनी घेतली माहिती
    • कंपनीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा
    • कामावर गैरहजर राहू नका, कामगारांना सूचना

    Because of Yashomati Thakur 48 Workers jobs were saved in Amravati

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा