विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : बारमध्ये जेवढी गर्दी होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरांमध्ये असते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
शेकापचे नेते आणि माजी दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आणि सुधारकरपंत परिचारक यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त फडणवीस पंढरपुरात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की,Bars are open but tempels are close,Devendra Fadnis criticise goverment
राज्यातील दारुची दुकाने उघडी ठेवता. मात्र, मंदिरांना बंद ठेवता हे चूक आहे. जेवढी गर्दी बार किंवा मॉलमध्ये होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरांमध्ये असते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे खुली करण्यास काय हरकत आहे? अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे.
हारवाल्यापासून ते पुजारी अशा अनेकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे. किमना त्यांच्यासाठी तरी मंदिरे खुली करण्यात यावीत.राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्यानंतर राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत.
यानंतर दुकाने, मॉल, हॉटेल आदींसाठी रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे ही पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Bars are open but tempels are close,Devendra Fadnis criticise goverment
महत्वाच्या बातम्या
- WATCH : भारतीयांना घेऊन जामनगर ला पोहचला C-17 ;150 भारतीयांना अफगाणिस्तानहुन आणलं गेलं परत
- WATCH : तालिबानी सैन्यात दोन मल्याळम नागरिक काँग्रेसचे नेते शशी थरुर यांचे ट्विट
- अलिगड नवे हरिगड, मैनपुरी नव्हे मयनगरी; उत्तर प्रदेशात नामांतरातून भारतीय परंपरेचे पुनरुज्जीवन…!!
- मोदीजी, अफगाणिस्तानातील गरीब, महिला आणि मुलांना वाचवा; सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या नातीचा टाहो