• Download App
    Balasaheb Thorat झेपेनात नाना, तर थोरातांशी बोला; काँग्रेसने ठाकरेंचा हट्ट पुरविला; पण थोरात पहिल्यांदा पवारांशी बोलले!!

    Balasaheb Thorat : झेपेनात नाना, तर थोरातांशी बोला; काँग्रेसने ठाकरेंचा हट्ट पुरविला; पण थोरात पहिल्यांदा पवारांशी बोलले!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : झेपेनात नाना, तर थोरातांशी बोला, असे म्हणत काँग्रेसने उद्धव ठाकरेंचा हट्ट पुरविला पण थोरात पहिल्यांदा पवारांशी बोलले.

    महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेनेने ताणून धरल्यानंतर काँग्रेसने देखील विदर्भातल्या जागा सोडायला नकार दिला त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात खडाजंगी झाली. जागावाटपाच्या चर्चेत नाना पटोले नकोत, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. शेवटी काँग्रेस हायकमांडने शिवसेनेची ही भूमिका मान्य केली आणि बाळासाहेब थोरात यांना चर्चेसाठी पुढे केले, पण बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरेंकडे मातोश्रीवर जाण्याआधी शरद पवारांशी बोलायला गेले.

    शिवसेनेने आपला बालेकिल्ला मुंबई नवी मुंबई ठाणे आणि कोकण हा पट्टा सोडून काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विदर्भात हल्लाबोल केला काँग्रेसने 8 जागा देऊ केल्या असताना शिवसेनेने 12 जागा मागितल्या. यातून काँग्रेसचे संख्याबळ घटविण्याचा शिवसेनेने “डाव” आखला. तो “डाव” नानांनी ओळखला म्हणून नानांनी शिवसेनेला जागावाटपाच्या चर्चेत प्रखर विरोध केला. म्हणून मग शिवसेनेने जागा वाटपाच्या चर्चेत नानाच नकोत अशी भूमिका घेतली ही भूमिका सुरुवातीला काँग्रेस हायकमांडने मान्य केली. नाना पटोले यांच्या ऐवजी बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसकडून चर्चेसाठी मूक्रर केले. पण बाळासाहेब थोरात आज पहिल्यांदा शरद पवारांना भेटायला सिल्वर ओक वर गेले.

    पवारांशी बोलून आल्यानंतर थोरातांनी महाविकास आघाडीत कोणताही तिढा नसल्याचा दावा केला. त्यानंतर थोरात उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत.

    Balasaheb Thorat meets Sharad Pawar ahead of MVA seat-sharing meeting

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- धर्मच मला व मोदींना चालवत आहे, जोपर्यंत धर्म भारताला मार्गदर्शन करेल, तोपर्यंत देश विश्वगुरू राहील