या अभियानात ऐतिहासिक स्थळ थिबा राजवाडा रत्नागिरी आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.’Azadi Ka Amrit Mahotsav’: Nehru Youth Center launches Swachh Bharat Abhiyan at historic Thiba Rajwada
विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : नेहरू युवा केंद्र रत्नागिरी यांच्या तर्फे ऐतिहासिक स्थळ थिबा राजवाडा परिसरात दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी भारत सरकारचा ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘स्वच्छ भारत’ अभियान राबवण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदुरानी झाखड,व्यसनमुक्ती सेवा केंद्राचे बाळ सत्याधारी महाराज व त्यांचे सहकारी तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालय चे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमधिकारी सोनाली कदम व शिवाजी उकरंडे व त्यांचे स्वयंसेवक उपस्थित होते.
तसेच नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मोहित कुमार सैनी व राष्ट्रीय युवा स्वयंसेवक आणि पुरातत्व विभागाचा स्टाफ यांची उपस्थिती होती.
या अभियानात ऐतिहासिक स्थळ थिबा राजवाडा रत्नागिरी आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. व्यसनमुक्ती सेवा केंद्र तर्फे ग्रास कटर च्या सहाय्याने आजूबाजूच्या परिसरातील गवत काढण्यात आले. एकत्रित केलेले प्लास्टिक व कचरा नगर परिषदेच्या गाडीत जमा केले. त्यानंतर या कार्याक्रमाचा समारोप करण्यात आला.
‘Azadi Ka Amrit Mahotsav’: Nehru Youth Center launches Swachh Bharat Abhiyan at historic Thiba Rajwada
महत्त्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटलांची मोठी ऑफर ; म्हणाले – राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांना पराभूत करा अन् सोन्याचा मुकुट मिळवा
- जी २३ नेत्यांचा उल्लेखही नाही, राहुलजींनाच काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्यावर एकमत; सप्टेंबर २०२२ मध्ये प्रक्रिया सुरू; अंबिका सोनींची माहिती
- पुण्यात भाड्याच्या फ्लॅटमध्ये ऑनलाईन जुगाराचा अड्डा, ४ लाख २२ हजार रुपयांचा माल जप्त,७ जणांना अटक
- आरोग्यमंत्री मंडावियांवर माजी पीएम मनमोहन सिंग यांच्या कन्येचा संताप, हॉस्पिटलमधील फोटोसेशनवर सुनावले, म्हणाल्या – माझे वडील प्राणिसंग्रहालयातील प्राणी नाहीत!