वृत्तसंस्था
मुंबई : कामावर हजर व्हा, असा अखेरचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने दिला आहे. ३१ मार्च ही अखेरची मुदत आहे. गेल्या काही दिवसांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती निराशा आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर तयार झालेल्या तीन सदस्यीय समितीच्या अहवालानंतर सरकारनं विलिनीकरणाविषयी आपली भूमिका सादर करत कर्मचाऱ्यांची मागणी फेटाळली आहे. Attend to work, Government’s last warning to ST employees: Get to work by 31st March
अशात कर्मचाऱ्यांना आता महिना अखेरचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा. कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे. कोणाचीही नोकरी जाणार नाही, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. त्याचेळी जर कामावर रुज्जू झाला नाही तर हा अखेरचा पर्याय आहे, असा इशाराही देण्यात आला आहे.