• Download App
    Manoj Jarange अंजली दमानियांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

    Manoj Jarange : अंजली दमानियांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट; संतोष देशमुख हत्याप्रकरणी चर्चा

    Manoj Jarange

    प्रतिनिधी

    जालना : Manoj Jarange तीन दिवसांपूर्वी एका सभेत मनोज दादांना ‎‎चक्कर आली होती. म्हणून तब्येतीची ‎विचारपूस करावी, आतापर्यंत भेटलो नव्हतो. ‎‎फक्त फोनवर चर्चा झाली. पुढे त्यांना काही ‎‎आमची मदत हवी असेल, ताकद येण्यासाठी ‎‎म्हणा, मी नक्कीच त्यांच्यासाठी उभी असणार ‎‎आहे. तसेच संतोष देशमुख हत्या‎प्रकरणाबाबत पुढे काय दिशा ठरवायची,‎ यावर चर्चा झाली असल्याची माहिती अंजली ‎‎दमानिया यांनी दिली आहे.‎Manoj Jarange

    याप्रसंगी बोलताना अंजली दमानिया‎ म्हणाल्या की, संतोष देशमुख खून प्रकरणाची‎ चार्जशीट अर्धवट वाटत आहे. आरोपी‎ सुदर्शन घुलेचं स्टेटमेंट जेव्हा माध्यमांसमोर‎ आलं, मला ते पूर्णपणे अर्धवट वाटलं आहे.‎ कारण त्यात खुनानंतर पुढे काय झालं, तो कुठे‎ गेला, कोणाच्या मदतीने बाहेर राहिला, तेव्हा‎ कराडशी त्याचं बोलणं झालं की नाही.‎ याबाबत चकार शब्दसुद्धा स्टेटमेंटमध्ये‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ लिहिलेले नाहीत. पोलिसांनी अर्धवट स्टेटमेंट‎ का घेतलं, मी मागे म्हटलं होतं की, दहा लोक‎ आहेत. त्यांना सहआरोपी करणे गरजेचे होते. ‎व्हिडिओवर राजेश पाटील दिसले, प्रशांत‎ महाजन दिसले, हे सगळे असताना त्यांच्यावर‎ कारवाई झाली नाही. यापैकी कुणालाही‎ सहआरोपी केले नाही. यांना जर सहआरोपी‎ केलं तर याचे धागेदोरे थेट धनंजय मुंडेंपर्यंत‎ जातात, म्हणून हे मुद्दाम केले गेले नाही, असा‎ आरोप दमानिया यांनी याप्रसंगी केला आहे.‎



    तब्येतीच्या विचारपूससाठी भेट‎

    अंजली दमानिया तब्येतीची विचारपूस‎ करण्यासाठी मुंबईहून आल्या. त्यांचा‎ कामाचा आवाका मोठा आहे. तरी पण त्यांनी‎ ठरवलं भेटायला जाऊ. बीडला शिक्षकांच्या‎ कार्यक्रमांमध्ये माझं अंग गार पडलं होतं.‎ त्यानिमित्ताने ताई भेटायला आल्या. दुसरे‎ काही नाही, असे मनोज जरांगे यांनी‎ सांगितले.‎

    Anjali Damania meets Manoj Jarange; discusses Santosh Deshmukh murder case

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस