• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Chagan Bhujbal : छगन भुजबळांनी पालकमंत्रिपदाचा हट्ट सोडला, म्हणाले – सिंहस्थापूर्वी कामे मार्गी लागणे महत्त्वाचे

    नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी भाजप व शिवसेनेमध्ये वाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या पदावरील आपला हट्ट सोडला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी कामे मार्गी लागणे महत्वाचे आहे. त्यासाठी पालकमंत्रिपद हवेच असे काहीही नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

    Read more

    State Government : राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय; वारीला गाडीने जाणाऱ्यांना टोलमाफी, शासन निर्णय जारी

    पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वारकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. वारीला गाडीने जाणाऱ्यांना टोलमाफी देण्यात आली आहे. 18 जूनपासून 10 जुलैपर्यंत दरम्यान हा निर्णय लागू असणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केला असून 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर ही टोलमाफी देण्यात आली आहेत.

    Read more

    प्रधानमंत्री धरती आबा योजनेतून महाराष्ट्रात आदिवासींना प्रातिनिधीक स्वरुपात वनपट्टे वाटप!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मनोर, पालघर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमे’चा शुभारंभ करण्यात आला.

    Read more

    Dhirubhai Ambani धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरून कोट्याधीश झाला; अजितदादांच्या वक्तव्यानंतर वाद उसळला!!

    माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फारच प्रतिष्ठेची केल्यानंतर तिच्यात चुरस निर्माण झाली. भाजपचे नेते चंद्रराव तावरे यांच्या पॅनलचे आव्हान अजितदादांना जड वाटायला लागले.

    Read more

    लँड जिहाद रोखण्यासाठी सुरू झालाय नवा “मुळशी पॅटर्न”; गावागावांमध्ये ठराव करून मुस्लिम समुदाय नियंत्रण समिती स्थापन!!

    गुंठामंत्री आणि हुंडाबळी यामुळे मुळशी नावाचे गाव फार बदनाम झाले. जमिनीतले घोटाळे आणि गैरव्यवहार म्हणजे “मुळशी पॅटर्न”, जमीन हडपण्यासाठी आणि हुंड्यासाठी बळी घेणे म्हणजे “मुळशी पॅटर्न”, अशी नवी व्याख्या रुजली.

    Read more

    Kundmala Bridge Accident : कुंडमळा पूल दुर्घटना- मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर; जखमींवर शासनाकडून मोफत उपचार

    मावळमधील कुंडमाळा गावाजवळ मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 40 पेक्षा जास्त लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, यातील 38 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 38 जणांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एक गंभीर जखमी असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे. तसेच, या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत देणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डूडी यांनी दिली.

    Read more

    kundmala bridge : पुण्याच्या कुंडमळात इंद्रायणीवरील पूल कोसळून दोन ठार; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- आतापर्यंत चौघांचा मृत्यू, 50 जणांना नदीपात्रातून काढण्यात यश

    जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ रविवारी दुपारी 3:30 वाजता इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला.पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, साडेतीन वाजता अशी दुर्घटना घडल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि त्यानंतर आम्ही सक्रिय झालो असून तेव्हापासून बचावकार्य युद्धपातळीवर सुरूच आहे. तर आतापर्यंत 38 पर्यटकांना रेस्क्यू करण्यात आले आहे.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : 3 महिने पूल बंद होता, पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी लोक पोहोचले आणि अचानक कोसळला… पुण्यात कशी घडली मोठी दुर्घटना?

    पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडेला लागून असलेल्या कुंडमाळा परिसरात रविवारी एक जुना लोखंडी पूल कोसळला. हा पूल इंद्रायणी नदीवर बांधण्यात आला होता, जिथे पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पूल कोसळला. हा पूल अनेक महिन्यांपासून वाहनांसाठी बंद होता

    Read more

    वयाच्या मुद्द्यावर अजितदादांची चंद्रराव तावरेंवर टीका; पण आधी त्यांनीच काढल्या होत्या चंद्ररावांच्या नाकदुऱ्या!!

    वयाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चंद्रराव तावरेंवर टीका केली, पण त्याआधी त्यांनीच चंद्ररावांच्या नाकदुऱ्या काढल्या होत्या ही वस्तुस्थिती समोर आली.

    Read more

    मोठी बातमी! इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, ३० जण बुडाल्याची भीती

    चिंचवड भागात आज (१५ जून) संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवरील पूल नदीत कोसळला, ज्यामुळे अनेकजण वाहून गेले आहेत.

    Read more

    ठाकरे बंधू एकत्र येवोत किंवा न येवोत, महाविकास आघाडी होवो किंवा न होवो, उद्धव ठाकरेंनी मांडले 300 चे गणित!!

    महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येवोत किंवा न येवोत, महाविकास आघाडी होवो किंवा न होवो उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेचे 300 चे गणित मांडून शाखाप्रमुख यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कामाला लावले.

    Read more

    पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार – खासदारांचा एकमेकांमध्ये नाही पायपोस; पण जयंत पाटील म्हणाले, मुंबईत भाजपला आणखी लोकांची गरज!!

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार आणि खासदार यांच्यात एकमेकांमध्ये नाही पायपोस; पण जयंत पाटील म्हणाले मुंबईत भाजपला आणखी लोकांची गरज!!, असला प्रकार समोर आला.

    Read more

    Sanjay Raut : एअर इंडियाच्या विमान अपघातामागे सायबर हल्ला? संजय राऊत यांची शंका, अवघ्या 30 सेकंदांत कसे पडले!

    अहमदाबाद येथील विमान अपघातात सायबर हल्ल्याची भीती व्यक्त करत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघात अहमदाबाद येथेच कसा झाला? या विमानतळाची देखरेख करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला. या माध्यमातून संजय राऊत यांनी विमान अपघाताच्या प्रकरणात केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

    Read more

    पवार + ठाकरेंची अजून एकी-बेकीचीच चाचपणी; पण संघाबरोबर समन्वय बैठक घेऊन भाजपची निवडणुकीची तयारी!!

    एकीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे अजून आपापल्या पक्षांच्या एकी-बेकीचीच चाचपणी करताहेत, तर दुसरीकडे भाजपने संघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर समन्वयाची बैठक घेऊन राज्यातल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी देखील सुरू केली आहे.

    Read more

    Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंनी बोलावले तर नक्की भेटेन – शिंदे गटाचे संजय शिरसाट; मनसे-ठाकरे युतीला शुभेच्छा

    राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एक धक्कादायक विधान करत म्हटले आहे की, “उद्धव ठाकरे यांनी मला बोलावले तर मी नक्की त्यांना भेटायला जाईन.” त्यांनी स्पष्ट केले की, ते राजकारण आणि वैयक्तिक नाती यामध्ये गोंधळ करत नाहीत. त्यामुळे त्यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

    Read more

    Bhaskar Jadhav : दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येऊ नये म्हणून भाजप प्रयत्नशील; ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचा आरोप

    उद्धव आणि राज हे दोन भाऊ एकत्र येण्याबद्दल आम्ही आशावादी आहोत. मात्र दोन भाऊ व दोन्ही पक्ष हे एकत्र येणार नाही यासाठी भाजपा प्रयत्न करीत आहे, असा आरोप उबाठा नेते भास्कर जाधव यांनी येथे माध्यमांशी बोलताना केला. घराघरात भांडणे लावून राजकीय स्वार्थ कसा साधता येईल याचा विचार भाजप करीत आहे. राज व उद्धव ठाकरे एकत्र आले तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५४ टक्के मते या दोन भावांना मिळतील, असा सर्व्हे आहे, त्यामुळे भाजप घाबरलेला आहे, असे जाधव यांनी सांगितले.

    Read more

    Imtiaz Jaleel : “नेत्यांच्या दबावाखाली एफआयआर दाखल!” – इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप, उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

    येथे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एक धक्कादायक आरोप करत पोलिस प्रशासन आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “माझ्यावर दाखल झालेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा हा केवळ राजकीय दबावामुळे दाखल करण्यात आला आहे.” यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे प्रकरण उच्च न्यायालयात नेण्याचा इशारा दिला.

    Read more

    Devendra Fadnavis : पैसा नाही तर माणूस हेच आज खरे भांडवल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

    “आज पैसा नाही तर माणूस हेच खरे भांडवल आहे. उद्योगधंदे तिथेच जातात जिथे प्रशिक्षित कामगार, संशोधन आणि नवकल्पना असतात. त्यामुळे गुणवत्तापूर्ण आणि बहुविध कौशल्य असलेली कार्यबल तयार करणे अत्यावश्यक आहे. यामुळे मानव संसाधन विकास हीच खरी गुंतवणूक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    Read more

    Devendra Fadnavis : परदेशी शिक्षणाची गंगा आता मुंबईच्या अंगणी!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज(शनिवार) मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रात कॅम्पस स्थापन करण्यासाठी 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना ‘लेटर ऑफ इंटेंट’ (LOIs) प्रदान केले. हा कार्यक्रम ‘मुंबई रायझिंग – क्रिएटिंग अ‍ॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबाद-लंडन विमान अपघातसारख्या कठीण प्रसंगी भारताच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल जागतिक समुदायाचे आभार मानले.

    Read more

    Sanjay Raut : अहमदाबाद विमान अपघातामागे सायबर हल्ला? संजय राऊत यांची गंभीर शंका; अदानींवरही अप्रत्यक्ष टोला

    अहमदाबाद येथील भीषण विमान अपघातामागे सायबर हल्ला असू शकतो, अशी गंभीर शंका शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

    Read more

    Vijay wadettiwar : वडेट्टीवारांनी हाणली पवारांची कॉपी; पण निदान त्यांची कारणे तरी मोठी!!

    काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांची कॉपी हाणली, पण निदान ती कॉपी करण्याची वडेट्टीवार यांची कारणे तरी मोठी निघाली.

    Read more

    Ajit Pawar : पुण्यात पाऊस अन् कोरोनाबाबत प्रशासन सतर्क, ठोस उपाययोजना करण्यास सुरूवात

    पुण्यात मुसळधार पावसामुळे आणि सध्याच्या आरोग्यविषयक आव्हानांमुळे जनतेला सावध राहण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. शुक्रवारी रात्री पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागांमध्ये, विशेषतः हिंजवडीमध्ये पाणी साचले होते, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

    Read more

    म्हणे, राष्ट्रवादीची भाजप सोडून इतरांशी युती; पण पवारांच्या आमदारांच्या मनात रूतली भीती!!

    राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) NCP SP अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजप सोडून इतर पक्षांशी युती करायची तयारी केली, त्याबरोबर पवारांच्या आमदारांच्या मनात वेगळीच भीती रुतून बसली.

    Read more

    Ajit Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दोन्ही राष्ट्रवादींची युती? शरद पवार भाजप वगळता कुणासोबतही जाण्यास तयार!

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्यास पक्ष सकारात्मक असल्याचे पक्षातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही पर्याय असणार आहे. यामुळे काका-पुतणे एकत्र येणार का? याची चर्चा सुरू आहे.

    Read more

    Raj Thackeray : डीजीसीएने आधीच कारवाई का नाही केली?; राज ठाकरे यांचा सरकारला सवाल; ‘ड्रीमलाइनर’ची सेवा खंडित करण्याची मागणी

    अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. या विमानाला जगभरात बंदी असताना भारतात डीजीसीएने आधीच कारवाई का केली नाही? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नाही तर कोणत्याही दबावाला बळी न पडता आता तरी तात्काळ या विमानांची सेवा खंडित करून देण्यात आलेल्या ऑर्डर रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

    Read more