• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Eknath Shinde’ : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला – 30 वर्षांची माया कुठे गेली, लंडनला? पूरग्रस्तांना तुम्ही बिस्किटचा पुडा तरी नेला का?

    एकनाथ शिंदे यांनी गोरेगावातील दसरा मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत आणि थेट आरोप करत हल्लाबोल केला. त्यांच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्यावरही शिंदेनी जोरदार टीका केली. तुम्ही एक बिस्किटचा पुडा तरी नेला का? असा सवाल शिंदेंनी केला. तसेच एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी सर्वच गमावले, अशी टीकाही शिंदे यांनी केली. सावरकरांवर टीका करणाऱ्यांच्या शेजारी बसता. बाळासाहेब असते, तर उलटे टांगून धुरी दिली असती, असा घणाघातही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

    Read more

    Maharashtra : केंद्राकडून महाराष्ट्राला मोठी मदत; कराचे आगाऊ 6 हजार 418 कोटी हस्तांतरित

    सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह सर्व राज्य सरकारांना कराचा आगाऊ हप्ता हस्तांतरित केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला 6 हजार 418 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हे हस्तांतरण 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामान्य मासिक हस्तांतरणाव्यतिरिक्त असून, राज्यांना त्यांच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी तसेच कल्याणकारी आणि विकास योजनांसाठी निधी उपलब्ध व्हावा या उद्देशाने करण्यात आले आहे.

    Read more

    तुझ्या सकट अजित पवारचा कार्यक्रम लावीन; मनोज जरांगेंची शेलक्या शब्दांमध्ये टीका

    मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे काल दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांच्यावर शरसंधान साधलेच, पण आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या सकट अजित पवारांना सुद्धा घेरले. धनंजय मुंडे आणि अजित पवारांचे राजकारण संपविण्याची धमकी दिली.

    Read more

    Anjali Damania : अंजली दमानिया यांचा सवाल- पंकजा मुंडेंना वाल्मीक कराडविषयी काय वाटते? दसरा मेळाव्यात झळकले पोस्टर

    मंत्री पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे दसरा मेळावा आज पार पडला. मात्र, यंदाच्या मेळाव्यात एका प्रसंगामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही तरुणांच्या हातात सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडे फोटो झळकले. यावरून अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडे यांच्या निशाणा साधला आहे. पंकजा मुंडेंना वैयक्तिकरित्या वाल्मीक कराड यांच्या बाबत काय वाटते? असे प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारले पाहिजे, असे अंजली दमानिया म्हणाल्या. तसेच यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांना गॉन केस म्हटले.

    Read more

    Ramraje Warns : रामराजेंचा रणजीत नाईक निंबाळकर यांना इशारा, मनोमिलन एकतर्फी प्रेमातून होत नाही

    मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल. राजकारण करायचं असेल तर विचार करावा लागेल, असा इशारा विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांना दिला आहे.

    Read more

    Uddhav Thackeray : मी आणि राज एकत्र येणार का? असे कुणीतरी बोलले. मग आम्ही पाच जुलै रोजी काय केले?

    मी आणि राज एकत्र येणार का? असे कुणीतरी बोलले. मग आम्ही पाच जुलै रोजी काय केले? तेव्हा मी बोललो आहे, आम्ही एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल, तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडून देणार नाही, असे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत युती होणार असल्याचे स्पष्ट केले.

    Read more

    Uddhav Thackeray : सोनम वांगचुक देशद्रोही तर नवाज शरीफ यांचा केक खाणाऱ्यांना काय म्हणायचे?

    लेह लडाखसाठी लढणारे सोनम वांगचूक हे पाकिस्तान जाऊन आले म्हणून देशद्रोही ठरत असतील तर गुपचूप पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक खाऊन आलेल्या नरेंद्र मोदी यांना काय म्हणायचे, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला आहे.

    Read more

    उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा हक्क नाही, उध्दव ठाकरे यांच्यावर रामदास कदमांचा हल्लाबोल

    उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा हक्क नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतरही दोन दिवस उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मृतदेह तसाच ठेवून दिला होता.

    Read more

    मनोज जरांगेंनी मराठा समाजाला आज शासक + प्रशासक बनायचे सांगितले; मग त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आपले मराठा उमेदवार का नव्हते दिले??

    मराठा आरक्षण आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांनी आज दसरा मेळाव्यात भाषण करताना मराठा समाजाला शासक आणि प्रशासक बनायला सांगितले.

    Read more

    राहुल कोलंबियात म्हणाले, चीन बलाढ्य, त्यांच्याशी लढाईचे कसे??, पण तिकीट फाडले परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यावर!!

    चीन बलाढ्य आहे. त्यांच्याशी कसे लढायचे??, असा सवाल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कधी केला नव्हता. पण राहुल गांधींनी मात्र तिकीट त्यांच्यावरच फाडले.

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची कडाडून टीका- उद्धव ठाकरेंना आत्मचिंतन करण्याची गरज, तुम्ही CM असताना काय केले? शेतीच्या बांधावर किती वेळा गेले?

    उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? त्यांनी शेतकऱ्यांना काय दिले? शेतकऱ्यांचे किती अश्रू पुसले? शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले? हे सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे आधी उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

    Read more

    दसरा मेळाव्यांची सीमोल्लंघने; राजकीय लाभासाठी भाषणांची पारायणे!!

    दसरा मेळाव्यांची सीमोल्लंघने; राजकीय लाभासाठी भाषणांची पारायणे!!, असेच आजच्या दसऱ्याच्या राजकीय मेळाव्यांचे वैशिष्ट्य ठरले. सकाळी झालेला संघाचा मेळावा हा शताब्दी मेळावा ठरला. त्यामध्ये संघ + सेवाभाव + समर्पण या विषयावर अधिक चर्चा झाली. त्याचबरोबर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सध्या प्रचलित झालेल्या आर्थिक नीतीचा फेरविचार करायचे आवाहन सरकारसह सर्व समाजाला केले कारण सध्याच्या प्रचलित अर्थनितीत शोषकांना शोषणाचा सुरक्षित अधिकार देण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे गंभीर निरीक्षण त्यांनी नोंदविले.

    Read more

    Maharashtra ZP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग; जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षणाची 13 ऑक्टोबरला सोडत

    दिवाळीनंतर लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुराळा उडण्याची शक्यता आहे. राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या 336 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.

    Read more

    Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल- जयंत पाटलांनी जिल्ह्यातील कारखाने हाणले; राष्ट्रवादी पक्ष नव्हे, लुटारूंची टोळी

    भाजप आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. म्हैसवाड येथे बोलताना खोत यांनी जयंत पाटील यांनी जिल्ह्यात अनेक साखर कारखाने हाणले असल्याचा गंभीर आरोप करत, राष्ट्रवादी हा पक्ष नसून लुटारूंची आणि गुंडांची टोळी आहे, अशी थेट टीका केली.

    Read more

    Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता हॉटेल्स, दुकाने आणि आस्थापना 24 तास सुरू ठेवता येणार

    राज्यातील व्यापारी आणि ग्राहकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापना आता 24 तास उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाने यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील व्यापारी व्यवहारांना नवे बळ मिळण्याची आणि ग्राहकांना दिवस-रात्र सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

    Read more

    स्वदेशी आणि स्वावलंबन यांना पर्याय नाही; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा संघ शताब्दी संदेश!!

    दुसऱ्या देशांवरची आपली निर्भरता कमी करण्यासाठी स्वदेशी आणि स्वावलंबन यांना पर्याय नाही अशा स्पष्ट शब्दांमध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज संघ शताब्दीचा संदेश दिला.

    Read more

    Mohan Bhagwat : संघाचा शताब्दी विजयादशमी सोहळा- सरसंघचालक भागवत यांनी हेडगेवार यांना वाहिली श्रद्धांजली; शस्त्रपूजन केले

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) गुरुवारी विजयादशमीला संघटनेची शताब्दी साजरी करत आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी सर्वप्रथम आरएसएस संस्थापक डॉ. हेडगेवार यांना श्रद्धांजली वाहिली. प्रमुख पाहुणे माजी राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनीही श्रद्धांजली वाहिली.

    Read more

    संघ शताब्दी : पुणे महानगरात शताब्दी वर्षात संघशक्तीचे विराट दर्शन; विजयादशमी निमित्त 77 संचलने, 84 शस्त्र पूजन उत्सव!!

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला २०२५ च्या विजयादशमीला (२ ऑक्टोबर) १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक शताब्दी वर्षाच्या शुभारंभाचे औचित्य साधून पुणे महानगरात संघ शक्तीचे विराट दर्शन घडणार आहे.

    Read more

    Government : पूरग्रस्तांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जिल्हा वार्षिक निधीतील पैसे खर्च करण्यास मंजुरी, शासन निर्णय जारी

    मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर, शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून आर्थिक मदत करता येणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय राज्य सरकारने नुकताच जाहीर केला.

    Read more

    Eknath Shinde : दसरा मेळाव्यावर एकनाथ शिंदे म्हणाले- शक्तिप्रदर्शन नव्हे, शेतकऱ्यांची सेवा हाच दसरा मेळावा, परंपरा अबाधित ठेवणार

    शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा यावर्षी होणार असला तरी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पूर स्थिती लक्षात घेता त्या भागातील शिवसैनिकांनी मुंबईत न येता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

    Read more

    Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळाचे महत्त्वपूर्ण निर्णय; महाराष्ट्र बनणार ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर’चे हब, उद्योग विभागाचे GCC धोरण 2025 मंजूर

    महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. नागरिकांच्या आरोग्य सेवेपासून ते औद्योगिक विकास, ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा, नियोजनातील तांत्रिक प्रगती आणि न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणापर्यंत विविध स्तरांवर परिणाम करणारे हे निर्णय आहेत. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे राज्यातील जनजीवन अधिक सक्षम होईल, तसेच प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा- ओल्या दुष्काळाच्या सर्व सवलती लागू; पुढच्या आठवड्यात निर्णय, ई-केवायसीची अट शिथिल

    महाराष्ट्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यापूर्वी राज्यात केव्हाही ओला दुष्काळ जाहीर झाला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच दुष्काळ काळात लागू करण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजना सध्याच्या काळात लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे ते म्हणाले. सरकारकडून करण्यात येणारी मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पोहोचती केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रामुख्याने अधोरेखित केले.

    Read more

    ओला दुष्काळ मॅन्युअल मध्ये नाही, पण शेतकऱ्यांच्या दुष्काळी निकषांमधली सगळी मदत देऊ; मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द!!

    ओला दुष्काळ मॅन्युअल मध्ये नाही. पण शेतकऱ्यांना दुष्काळी निकषांमध्ये सगळी मदत देऊ. तिच्यात हयगय होणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.

    Read more

    Asaduddin Owaisi  : क्रिकेटची तुलना सैन्यांसोबत करीत आहेत, हे कितपत योग्य ? असदुद्दीन ओवेसी यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी इचलकरंजी : Asaduddin Owaisi  : पाकिस्तानसोबत व्यापार, पाणी, विमान व जहाज वाहतूक बंद केली असताना क्रिकेट सामना खेळून काय साध्य केले? क्रिकेट न […]

    Read more

    Eknath Shinde : नियम, अटी आणि शर्ती बाजुला ठेऊन शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय, एकनाथ शिंदे यांची माहिती

      विशेष प्रतिनिधी मुंबई : Eknath Shinde : संकटात मदत करणे ही सरकारची जबाबदारी व कर्तव्य आहे. नुकसानीची संपूर्ण माहिती आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री […]

    Read more