• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी फेटाळली शरद पवारांची टीका; म्हटले- जो जीता वही सिकंदर! लोकांनी आम्हाला मतदान केले, त्यांना दोष देण्याचे कारण काय?

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपवर पैसे वाटून बिहार निवडणूक जिंकल्याचा आरोप करणाऱ्या शरद पवारांची टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. विरोधी पक्षांनी त्यांचे सरकार होते तेव्हा कोणत्याही नव्या योजना आणल्या नाही. आता आमच्या योजना लोकांना आवडत आहेत. ते आम्हाला मतदान करत आहेत. त्यामुळे लोकांना दोष देण्याची काहीच कारण नाही. जो जीता वही सिकंदर, असे ते म्हणालेत.

    Read more

    Sharad Pawar Group : भाजपला फायदा करून देण्याची ‘सुपारी’ घेतली का? काँग्रेसच्या ‘स्वबळा’च्या भूमिकेवर शरद पवार गटाचा सवाल

    आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये अचानक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मुंबई काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथाला आणि अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याची एकतर्फी घोषणा करून महाविकास आघाडीतील समन्वयाचा भंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे अनपेक्षितपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, याचा थेट फायदा भाजपला होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. शरदचंद्र पवार प्रदेश प्रवक्ते आणि युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी काँग्रेसच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

    Read more

    Nitesh Rane : नीतेश राणेंचा काँग्रेस, मनसेला टोला, म्हणाले- काँग्रेस अन् मनसे एकमेकांचा दर्जा ठरवत आहेत, आपण लांबूनच हसलेले बरे

    भाजप आमदार तथा मंत्री नीतेश राणे यांनी मनसेवर टीका करत मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसला खोचक टोला हाणला आहे. काँग्रेस व मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागलेत. त्यामुळे आपण लांबूनच हसलेले बरे, असे ते म्हणालेत. काँग्रेसची बीएमसी स्वबळावर लढवण्याची भूमिका पोकळ असल्याचेही ते म्हणालेत.

    Read more

    Chandrakant Khaire : दोन्ही ठाकरे एकत्र आले तरच मुंबई ताब्यात येईल; चंद्रकांत खैरे यांचे वक्तव्य, बिहार निवडणुकीवरून काँग्रेसला फटकारले

    राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना आणि प्रचाराला वेग येत असतानाच, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर मोठे विधान केले आहे. दोघे भाऊ एकत्र आले, तर मुंबई महापालिका आपल्या ताब्यात येईल, असे खैरे म्हणालेत. यासोबतच त्यांनी काँग्रेसला फटकारत, आघाडी धर्म पाळण्याचे आवाहन केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

    Read more

    किशोरी पेडणेकर म्हणाल्या- काँग्रेसने बिहारमधील ऱ्हासातून बोध घ्यावा, स्वबळाचा निर्णय योग्य की अयोग्य लवकरच कळेल

    काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

    Read more

    शिल्पकलेतील किमयागाराचा महासन्मान; राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

    शिल्पकलेतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना नवी दिल्ली नजीक नोएडा येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेदेखील उपस्थित होते.

    Read more

    बिहारमध्ये अब्रू पुरती गेली; त्यानंतर काका – पुतण्याला सुचली पश्चात बुद्धी!!

    बिहारमध्ये अब्रू पुरती गेली; त्यानंतर काका फुटण्याला सुचली पश्चात बुद्धी!!, असंच म्हणायची वेळ पवार काका – पुतण्यांच्या प्रतिक्रियांवरून आली.

    Read more

    Fadnavis : बिहारचा निकाल काँग्रेसच्या विषारी प्रचाराला जनतेचे उत्तर; मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला- काँग्रेस पक्ष MIMच्याही खाली गेला

    बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीए आघाडीवर असून जवळपास विजय हा निश्चितच झाल्याचे दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी देशात जो विषारी प्रचार चालवला आहे, त्याला जनतेने उत्तर दिल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे राजधानी दिल्ली येथे असून पत्रकारांशी संवाद साधताना बिहार निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more

    Ambadas Danve : अंबादास दानवे सुरक्षित घर शोधण्याच्या प्रयत्नात, खासदार नरेश म्हस्केंचे वक्तव्य, शिंदे गटाकडून दानवेंना ऑफर

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे सुरक्षित घर शोधण्याच्या प्रयत्नात असल्याचे विधान शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे. तसेच सुरक्षित घर मिळत असेल तर त्यांनी त्या सुरक्षित घरात राहावे, असा सल्ला देखील म्हस्के यांनी दानवे यांना दिला आहे. इतकेच नव्हे तर अंबादास दानवे यांना आम्ही आमंत्रण देतो, ते देखील योग्यच विचार करत आहेत, असे सूचक वक्तव्य देखील म्हस्के यांनी केले आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सत्य पचवत नाहीत तोपर्यंत त्यांचा पराभव होत राहणार

    जोपर्यंत हे लोक सत्य पचवत नाहीत तोपर्यंत त्यांचा पराभव होत राहणार, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला आहे.बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीए आघाडीने विक्रमी बहुमत मिळविले आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजप आणि एनडीए या सर्व घटक पक्षांच्या बिहार युनिटचे मी अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचे आभार मानतो. त्यांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, नितीश कुमार यांच्या सुशासनावर विश्वास ठेऊन आणि आमच्या घटक पक्षाला त्या ठिकाणी एनडीएच्या माध्यमातून प्रचंड मोठे बहुमत दिले आहे. 2010 चा सुद्धा रेकॉर्ड तुटू शकेल इतके बहुमत मिळाले आहे.

    Read more

    Laxman Hake : मूळ ओबीसींना तिकीट न दिल्यास ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार; लक्ष्मण हाके यांचा पक्षांना इशारा; बोगस कुणबींना विरोध

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मूळ ओबीसी उमेदवारांना तिकीट न दिल्यास संबंधित पक्षांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी ओबीसी नेते मंगेश ससाणे उपस्थित होते.

    Read more

    Sharad Pawar, : शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा मोठा दिलासा; ‘तुतारी’ सदृश ‘पिपाणी’ चिन्ह वगळले

    लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हाशी साधर्म्य असलेल्या ‘पिपाणी’ (ट्रम्पेट) चिन्हामुळे मोठा फटका बसल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवार गटाला अखेर निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे. आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी आपल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ हे चिन्ह वगळले आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगेंची टीका- धनंजय मुंडे म्हणजे शेखचिल्ली, ज्या फांदीवर बसतात तीच तोडतात, नार्को टेस्टचाही उल्लेख

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरूवारी पुन्हा एकदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. धनंजय मुंडे हे शेखचिल्ली आहेत. ते ज्या फांदीवर बसतात, तीच फांदी तोडतात. त्यांनी नार्को टेस्टच्या मागणीवरून मागे हटू नये. या चाचणीतून तरी त्यांनी महादेव मुंडे यांचे काय केले, बापू आंधळेंचे काय केले, गित्तेचे काय केले व संतोष देशमुख प्रकरणात काय केले हे समोर येईल. नार्टो टेस्टमधून त्यांनी अंधारात किती चाली रचल्या हे ही सत्य समोर येईल, असे ते म्हणाले.

    Read more

    Vijay wadettiwar : विजय वडेट्टीवार म्हणाले- अजित पवारांवर सत्ता सोडण्याची वेळ आणली जाईल; महायुतीत पहिला आघात राष्ट्रवादीवर होईल

    सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपकडून सत्तेतून बाहेर पडण्याची वेळ आणली जाईल, असा दावा काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

    Read more

    पुण्यात नवले ब्रीजवर भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 20 जखमी; कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने 25 वाहनांची धडक

    पुणे येथील नवले पुलावर दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची एक भीषण अपघात घटना घडली आहे, ज्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाल्याचे समजते.

    Read more

    नाशिक मध्ये मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन; जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे ‘सिंहस्थ कुंभमेळा 2027’च्या पार्श्वभूमीवर रामकाल पथ विकसन करणे या कामाचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण केले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘सिंहस्थ कुंभमेळा 2027’च्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांना काही विशेष सूचना केल्या. त्याचबरोबर त्यांनी 5000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकास कामांचे भूमिपूजनही केले.

    Read more

    आधीच्या निवडणुकीत सर्वपक्षीय 31 मुस्लिम नगरसेवक निवडून देणाऱ्या मुंबईत असदुद्दीन ओवैसींचा AIMIM पक्ष एकटा देणार 50 उमेदवार; कुणावर होणार परिणाम??

    मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी 2017 मध्ये सर्वपक्षीय 31 मुस्लिम नगरसेवक निवडून आले. त्यामध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्ष मुस्लिम नगरसेवकांना निवडून आणण्यात आघाडीवर होते. पण आता या दोन्ही पक्षांच्या पोटात गोळा आला आहे. कारण खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष ऑल इंडिया मुक्तहिदा मुसलमीन (AIMIM) याने तब्बल 50 उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी स्वतःच ही घोषणा केली.

    Read more

    Amol Mitkari : अमोल मिटकरींची अंजली दमानियांवर टीका, इतकाच अभ्यास UPSCसाठी केला असता तर..

    पुण्यातील जमीन खरेदी गैरव्यवहारावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत बरेच खुलासे केलेत. सोबतच या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे व्हावी, यासाठी दमानिया यांनी अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रीपद आणि पालकमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अंजली दमानिया यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.

    Read more

    Shiv Sena : शिवसेनेवर 21, 22 जानेवारीला सलग 2 दिवस सुनावणी; सुप्रीम कोर्टाकडून दोन्ही पक्षांना युक्तिवादासाठी 5 तासांचा अवधी

    शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत आज अखेर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरूवात झाली. त्यात न्यायालयाने या प्रकरणी दोन्ही पक्षकारांना युक्तिवादासाठी किती वेळ लागेल? अशी विचारणा करत त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर सुनावणी 21 जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकली. कोर्टाने या प्रकरणी 21 व 22 असे सलग दोन दिवस सुनावणी होण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे पुढच्या सुनावणीत न्यायालय दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आपला निकाल देऊ शकते किंवा तो राखून ठेवू शकते. या सुनावणीवरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.

    Read more

    म्हणे, पवार – शेलार युतीचा बंपर फायदा; पण पवार अजून किती “खाली” उतरणार??

    मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या युतीने 16 पैकी 12 जागा जिंकून बाजी मारली. “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांनी त्या विषयाचे वर्णन पवार – शेलार युतीचा बंपर फायदा, अशा शब्दांनी केले त्यामुळेच पवार – शेलार युतीचा बंपर फायदा; पण पवार अजून किती “खाली” उतरणार??, असा सवाल समोर आला.

    Read more

    Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना ‘युती’चा प्रस्ताव; अजित पवार गटाच्या नेत्याचा दावा; ‘स्थानिक’च्या निवडणुकांत दोन्ही पवार एकत्र दिसणार?

    \राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत असल्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्थानिक निवडणुकांमध्ये एकत्र येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये संवाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

    Read more

    सोफ्यावर अदानी, खुर्चीवर फडणवीस; असले फोटो शेअर करावे लागतात यातच सगळे आले!!

    सोफ्यावर अदानी, खुर्चीवर फडणवीस; नुसते फोटो शेअर करून काय होणार??, असा असावा विचारण्याची वेळ शरद पवारांनी शेअर केलेल्या फोटो मुळे आली, पण त्या पलीकडे जाऊन पवारांना असले फोटो शेअर करावेसे वाटतात किंबहुना शेअर करावे लागतात, यातूनच सगळे राजकीय रहस्य बाहेर आले!!, असे म्हणायची वेळ ही आली.

    Read more

    Jitendra Awhad : मुंबई क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड, नवीन शेट्टी यांचा 48 मतांनी केला पराभव

    मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत विविध पदांवर नवीन चेहऱ्यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवीन शेट्टी यांचा 48 मतांनी पराभव करून विजय मिळवला. तर, सचिव पदासाठी उन्मेष खानविलकर यांनी शाह आलम शेख यांचा पराभव करत बाजी मारली. संयुक्त सचिव म्हणून निलेश भोसले यांची निवड झाली, त्यांनी गौरव पय्याडे यांना पराभूत केले. दरम्यान, एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची याआधीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या संपूर्ण निवडणुकीसाठी एकूण 362 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

    Read more

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, फुकटचा ताठा अन् नाव उबाठा; खरे दगाबाज कोण हे जनतेने ओळखले!

    शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी अनुदानाच्या मुद्यावरून मराठवाड्याचा दौरा करत महायुती सरकारवर ‘दगाबाज’ म्हणत टीका केली होती. या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कोणी बांधली? खरे दगाबाज कोण हे जनतेने ओळखले आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. तसेच, ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा करताना शेतकऱ्यांना ‘एक बिस्किटचा पुडाही’ दिला नाही, अशी खोचक टीका करत ‘फुकटचा ताठा अन् नाव उबाठा’ असा उपरोधिक हल्लाबोलही केला.

    Read more