• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील दादागिरी आणि ड्रग्स प्रकरण चव्हाट्यावर; दोन्हीकडे “पवार संस्कारितांची” भांडणे उघड्यावर!!

    सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील निवडणूक दादागिरी आणि ड्रग्स प्रकरण चव्हाट्यावर आली, पण या दोन्हीकडे “पवार संस्कारितांनीच” आपली भांडणे उघड्यावर आणली.

    Read more

    Ajit Pawar : प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो; शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. भाजपवर मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडण्याचा आरोप करत शिवसेनेने ही भूमिका घेतली. त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी याबद्दल आपल्याला काही माहित नसल्याचे उत्तर दिले आहे.

    Read more

    Anjali Damania : पार्थ पवारांचे जमीन घोटाळा प्रकरण, न्यायालयामध्ये जाण्याचा दमानियांनी दिला इशारा

    पुण्यातील मुंढवा येथील जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीकडून खरेदी करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यावर व्यवहार रद्द करण्यात आले असल्याचे सांगितले गेले. मात्र, प्रशासनाने जो पर्यंत ४२ कोटी रुपये भरत नाही तो पर्यंत व्यवहार रद्द होणार नाही अशी नोटीस दिली असून त्याला सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.

    Read more

    Uday Samant : शिंदे गटाने फेटाळली नाराजीची चर्चा, मंत्री उदय सामंत म्हणाले – आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना नाही तर कुणाला सांगणार

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने आपल्या पक्षाच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे वृत्त जोरकसपणे फेटाळले आहे. एकनाथ शिंदे स्वतः मंत्रिमंडळ बैठकीला हजर होते. त्यामुळे शिवसेनेने मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही, असे शिंदे गटाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. दरम्यान, आम्ही आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना सांगणार नाही तर कुणाला सांगणार? असा उलट सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

    Read more

    सकाळी नाराजी, संध्याकाळी तोडगा; फडणवीस + शिंदेंनी विषय मिटवला!!

    स्थानिक राजकारणाच्या गदारोळात दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्येच एकमेकांना फोडून स्वबळ वाढवायची स्पर्धा लागली त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तीव्र नाराजी पसरली त्याचे पडसाद फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी बैठकीत आणि नंतर उमटले, पण सकाळची नाराजी संध्याकाळच्या तोडग्यामुळे संपुष्टात आली.

    Read more

    शिंदे गटाच्या 7 मंत्र्यांची नाराजी; पण अजितदादांना आणि त्यांच्या मंत्र्यांना नाराज होणे परवडेल का??

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले 7 मंत्री नाराज झाले आणि त्यांनी ती नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर त्यांच्या दालनात जाऊन उघडपणे बोलून दाखविली.

    Read more

    वांद्रे किल्ल्यावर ओली पार्टी; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती??

    वांद्रे किल्ल्यावर ओली पार्टी झाली. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळ्या महाराष्ट्रात संताप उसळला. संबंधित ओल्या पार्टीचे आयोजक महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्रालयात होते

    Read more

    बाळ ते बाळासाहेब; मीरा भाईंदरच्या नव्या कलादालनातून उलगडला भव्य व्यक्तिमत्त्वाचा प्रवास!!

    परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने मीरा भाईंदर येथे साकारण्यात आलेल्या स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कलादालनाचे उद्घाटन केले. या कलादालनाच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या स्मृती अनोख्या पद्धतीने जतन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

    Read more

    Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- कर्जमाफी महत्त्वाचीच आहे, पण ते अंतिम उत्तर नाही

    शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. अलीकडच्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात झालेले शेतीचे नुकसान, त्यावरचे भरपाईचे पॅकेज आणि कर्जमाफीची मागणी, या सर्वांवर विरोधक सरकारला घेरत असतानाच फडणवीस यांनी कर्जमाफी महत्त्वाचीच आहे, पण कर्जमाफी हे अंतिम उत्तर नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे सरकारची भूमिका नेमकी काय? असा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा दावा- धनंजय मुंडेंचे अजित पवारांसमोर लोटांगण; चौकशीतून वाचवण्याची केली विनवणी

    मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठा दावा करत, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मला या चौकशीतून वाचवा, अशी विनवणी करत, धनंजय मुंडे यांनी अजित पवारांसमोर लोटांगण घातल्याचा मोठा दावा मनोज जरांगे यांनी केलाय. मोठा घातपात घडवून आणल्याचा कट असतानाही सरकार मुंडेंना ‘क्लीन चीट’ देणार असेल, तर हा अत्यंत वाईट प्रकार असून आपला या ‘नालायक’ सरकारवरील विश्वास उडाला आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

    Read more

    Amit Thackeray : अमित ठाकरे म्हणाले- कबुतरांपेक्षा महाराजांसाठी गुन्हा दाखल झाला हे चांगले:राज ठाकरेंच्या घरात वाढलोय, कोर्टात जाईन

    कबुतरांपेक्षा महाराजांसाठी जर गुन्हा दाखल होत असेल तर ते चांगले आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिली आहे. तसेच अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे देखील अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ उतरले आहेत.

    Read more

    Maharashtra Winter : 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन; अतिवृष्टीची मदत, कर्जमाफीवरून विरोधकांची घेरण्याची तयारी

    राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी एका अधिसूचनेद्वारे ही घोषणा केली. या अधिवेशनात राज्यातील कळीचे कायदे, जनहिताचे प्रश्न व विभागीय विकास आदी मुद्यांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात झालेल्या दिरंगाईवरही या अधिवेशनात गरमागरम चर्चा होण्याची शक्यता आहे.

    Read more

    मोठा दिलासा: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता.

    Read more

    येवल्यात भुजबळांशी युती, बारामतीत अजितदादांशी फाईट; भाजपने केली राष्ट्रवादीची हवा टाईट!!

    येवल्यात भुजबळांशी युती, बारामतीत अजितदादांशी फाईट; भाजपने केली राष्ट्रवादीची हवा टाईट!!, अशा पद्धतीचे दुहेरी राजकारण आज भाजपने खेळले

    Read more

    Shashi Tharoor : थरूर म्हणाले- 1989-90 मध्ये काश्मीरातून दहशतवाद सुरू झाला; आता दिल्ली-मुंबईपर्यंत पसरला

    काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी रविवारी सांगितले की, “१९८९-९० मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद सुरू झाला आणि हळूहळू मुंबई, पुणे आणि दिल्लीत पसरला. गेल्या ३० वर्षांपासून भारत दहशतवादाच्या आव्हानाचा सामना करत आहे. आता, मजबूत आणि प्रभावी कारवाईची आवश्यकता आहे.”

    Read more

    Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा- हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसली; स्थानिकच्या निवडणुकांतही ‘माती’ होण्याचे भाकीत

    विरोधक हे सातत्याने आरोप करतात, पण कोर्ट जेव्हा त्यांना पुरावे मागते, तेव्हा ते देत नाहीत. निवडणूक आयोग देखील त्यांना पुरावे मागतो, पण एक पुराव देखील विरोधक देऊ शकत नाहीत. हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसलेली आहे, मात्र अजुनही ते सुधरले नाहीत. महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्यांची अशाच प्रकारची माती होणार असल्याचे भाकित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    Read more

    Yogesh Kshirsagar : बीडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का, योगेश क्षीरसागरांचा सपत्नीक भाजपमध्ये प्रवेश

    नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना जिल्ह्याच्या राजकारणात मोठी हालचाल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बीडमध्ये मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे भाऊ योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांची साथ सोडून थेट भाजपचा हात धरला आहे. आज छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. आता योगेश क्षीरसागर हे भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावरून बीड नगरपालिका निवडणूक लढवणार आहेत.

    Read more

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणाले- तेजस्वींच्या सभेतील गर्दी AI ची होती का? बिहारमधील निकाल कळण्याच्या पलिकडचे

    मुंबईत आमदार चषकाच्या टी-शर्ट आणि लोगोचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करताना भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. तेजस्वी यादवांच्या प्रचार सभेला लोकांची प्रचंड गर्दी होती, ती एआयची होती का? असा सवाल करत, बिहारमधील निकाल कळण्याच्या पलिकडचे आहेत, असे म्हणत निवडणूक प्रक्रियेवर आणि निकालाच्या ‘गणितावर’ प्रश्न उपस्थित केले.

    Read more

    Prithviraj Chavan : बिहार निवडणुकीवर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया, कॉंग्रेसने आत्मपरीक्षण करणे गरजेचे, जागावाटपात उदारमतवादी भूमिका घ्यायला हवी होती

    बिहार निवडणुकीच्या निकालांवर देशभरात चर्चा सुरू असताना, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या अंतर्गत गोंधळ, चुकीचे अंदाज आणि अपयशी रणनीतीवर थेट बोट ठेवले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना चव्हाण यांनी पक्षाला आरसा दाखवणारे वक्तव्य केले असून, त्यांनी काँग्रेसच्या सल्लागारांच्या निर्णयक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

    Read more

    छत्रपती संभाजी नगरात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मराठवाड्यात निवडणूक पूर्व राजकीय पेरणी!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजी नगरात जाऊन मराठवाड्यात निवडणूक पूर्व राजकीय पेरणी केली.

    Read more

    जलसंधारण, शिक्षण व सामाजिक परिवर्तनाचे अध्वर्यू वसंतराव नाईक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गौरव

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण व परिसरातील विकासकामांचे उदघाटन संपन्न झाले.

    Read more

    बिहार मधल्या बिगर घराणेशाही मुलीने तोडले पवारांच्या पक्षाने घराणेशाहीतून तयार केलेले रेकॉर्ड!!

    शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घराणेशाहीतून तयार केलेले रेकॉर्ड बिहार विधानसभा निवडणुकीत तुटले.

    Read more

    वसंतराव नाईक यांचा वारसा काँग्रेसने सोडला, भाजपने घेतला; पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाला काँग्रेसचा एकही बडा नेता नाही फिरकला!!

    वसंतराव नाईक यांचा वारसा काँग्रेसने सोडला, भाजपने घेतला; पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाला काँग्रेसचा एकही बडा नेता नाही फिरकला!!, असे आज छत्रपती संभाजी नगर मध्ये घडले.

    Read more

    Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी फेटाळली शरद पवारांची टीका; म्हटले- जो जीता वही सिकंदर! लोकांनी आम्हाला मतदान केले, त्यांना दोष देण्याचे कारण काय?

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपवर पैसे वाटून बिहार निवडणूक जिंकल्याचा आरोप करणाऱ्या शरद पवारांची टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. विरोधी पक्षांनी त्यांचे सरकार होते तेव्हा कोणत्याही नव्या योजना आणल्या नाही. आता आमच्या योजना लोकांना आवडत आहेत. ते आम्हाला मतदान करत आहेत. त्यामुळे लोकांना दोष देण्याची काहीच कारण नाही. जो जीता वही सिकंदर, असे ते म्हणालेत.

    Read more

    Sharad Pawar Group : भाजपला फायदा करून देण्याची ‘सुपारी’ घेतली का? काँग्रेसच्या ‘स्वबळा’च्या भूमिकेवर शरद पवार गटाचा सवाल

    आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये अचानक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मुंबई काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथाला आणि अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याची एकतर्फी घोषणा करून महाविकास आघाडीतील समन्वयाचा भंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे अनपेक्षितपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, याचा थेट फायदा भाजपला होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. शरदचंद्र पवार प्रदेश प्रवक्ते आणि युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी काँग्रेसच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

    Read more