• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Exit polls : पुणे + पिंपरी चिंचवड मध्ये मतदारांनी पवार ब्रँडचा पुरता उडवला बोऱ्या!!

    नाशिक : महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांमध्ये पवार ब्रँडने फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांवर लक्ष केंद्रित केले होते. “पवार बुद्धीचे” अनेक पत्रकार या ब्रँडच्या प्रमोशनसाठी […]

    Read more

    Exit polls : मुंबईत ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उखडली; काँग्रेस आणि ठाकरे यांची फारकत एकमेकांनाच नडली!!

    मुंबईत ठाकरेंची सत्ता 25 वर्षांनी उखडली; काँग्रेस आणि ठाकरे यांची फारकत एकमेकांनाच नडली!!, असे राजकीय वास्तव चित्र आजच्या एक्झिट पोल मधून समोर आले.

    Read more

    बाईचा विजय नाही, शाईचा विजय ते मार्कर पेनच्या शाईवर आक्षेप!!

    हा बाईचा विजय नाही, शाईचा विजय आहे, ते मार्कर पेन च्या शाईवर आक्षेप!! इथपर्यंत भारतीय लोकशाहीचा प्रवास आज येऊन ठेपला.

    Read more

    Exit polls : अजितदादांच्या दादागिरीवर महेश दादाच भारी; पिंपरी चिंचवड मध्ये मारली बाजी!!

    अजितदादांच्या दादागिरीवर महेश दादाच भारी पिंपरी चिंचवड मध्ये मारली बाजी!!, असे चित्र महापालिका निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर घेतलेल्या एक्झिट पोल मधून समोर आले.

    Read more

    कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना सुप्रिया सुळे बसल्या घरात; पण मतदानाच्या दिवशी सगळी मतदान प्रक्रियाच टाकली संशयाच्या भोवऱ्यात!!

    महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. हे कार्यकर्ते आमच्या मोठ्या निवडणुकांमध्ये राबतात. त्यामुळे त्यांच्या निवडणुकांमध्ये नेत्यांनी ऐकायचे असते

    Read more

    मुंबई महापालिका निवडणुकीत मतदान करून आल्यानंतर ठाकरे बंधूंची एवढी आगपाखड; तर निकालानंतर काय होईल??

    मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करून आल्यानंतर ठाकरे बंधूंनी एवढी आगपाखड केली, तर उद्या निकाल लागल्यानंतर ते काय करतील??, असा सवाल आज मतदानाच्या दिवशीच समोर आला.

    Read more

    भाजपच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये अजितदादांच्या विरोधात संताप; महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर होणाऱ्या कॅबिनेटमध्ये उमटणार पडसाद!!

    महापालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्याप्रमाणे वागलेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांना दोन्ही ठिकाणी घेरले

    Read more

    महाराष्ट्रातली जनता आज विकासाचा अजेंडा चालविणार, की ठाकरे, पवारांची घराणेशाही टिकविणार??

    महाराष्ट्रातली जनता आज विकासाचा अजेंडा चालविणार, की ठाकरे आणि पवारांची घराणेशाही टिकविणार??,

    Read more

    Khadse : 25 वर्षे भ्रष्टाचार का दडवला? तुम्हीही त्यात सामील आहात का? अजित पवारांच्या गौप्यस्फोटावर एकनाथ खडसेंचा सवाल

    महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत २५ वर्षांपूर्वीच्या सिंचन प्रकल्पावरून नवा राजकीय वाद पेटला आहे. १९९९ मधील भाजप आणि शिवसेना युती सरकारच्या काळात ‘पार्टी फंडा’साठी प्रकल्पांची किंमत वाढवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. मात्र, अजित पवारांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जोरदार पलटवार केला असून, “एवढी वर्षे तुम्ही भ्रष्टाचाराची माहिती दडवून ठेवली, म्हणजे तुम्हीही त्यात सामील आहात का?” असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित करत, तुमच्याकडची फाईल आता सार्वजनिक कराच, असे आव्हान अजित पवारांना दिले.

    Read more

    Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंना टोला- परप्रांतीयांना मारणे हा मराठी माणसांचा विकास नाही; मुंबईत महायुतीचा विजय निश्चित

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत महायुतीचा विजय निश्चित असल्याचा पुनरुच्चार केला. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच मागे उभा असल्याचे अधोरेखित होईल. विशेषतः भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, महायुतीच येथे राज्य करेल व मोदींच्या नेतृत्वात मिळालेल्या या विजयातून महाराष्ट्र कुणासोबत आहे हे ही स्पष्ट होईल, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी परप्रांतीयाना मारहाण करणे म्हणजे मराठी माणसांचा विकास नसल्याचा टोलाही ठाकरे बंधूंना हाणला.

    Read more

    Bawankule, : ‘पाडू’ मशीनवर आक्षेप ही ठाकरे बंधूंची पराभवाची तयारी; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा; मतदानाच्या आदल्या दिवशीच्या भेटीगाठीचेही केले समर्थन

    भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएमला जोडण्यात येणाऱ्या पाडू मशीनवरील आरोप फेटाळून लावलेत. ठाकरे बंधूंना आपल्या पराभवाची चाहूल लागली असून, त्यातून ते अशी विधाने करत आहेत, असे ते म्हणालेत. मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांच्या भेटीगाठी घेणे हे नियमांनुसारच आहे, असेही ते यावेळी म्हणालेत.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरेंचा आयोगाला सवाल- पाडू मशीन का आणलं? प्रचार संपला तरी मतदारांना भेटण्याची मुभा का?

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी निवडणूक प्रचार संपल्यानंतर मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांना देण्यात आलेल्या परवानगीवर हरकत घेतली. या प्रकरणी त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत ही परवानगी का मिळाली? का देण्यात आली? कायदा का बदलला? लोकसभा व विधानसभेला अशी मुभा का देण्यात आली नाही? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती केली आहे. राज यांनी यावेळी ईव्हीएमला जोडण्यात येणाऱ्या ‘पाडू’ मशीनच्या वापरावरही आक्षेप घेतला आहे. आयोगाने कोणत्याही राजकीय पक्षांना विश्वासात न घेता ही मशीन ईव्हीएमला जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आयोग सरकारला मदत करत असल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणालेत.

    Read more

    Manoj Jarange : माझा महायुती किंवा मविआला पाठिंबा नाही; मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना सहकार्य करू नका, मनोज जरांगेंचे आवाहन

    मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असतानाच, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत कोणत्याही राजकीय आघाडीला पाठिंबा दिला नसल्याचे जाहीर केले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाविकास आघाडी किंवा महायुती यांपैकी कोणाचीही बाजू घेतलेली नाही, असे स्पष्ट करत त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, माझ्या नावाने कोणी पाठिंब्याचे पत्रक प्रसिद्ध करत असेल, तर त्यावर समाजाने विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत त्यांनी मतदानाच्या तोंडावर होणाऱ्या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

    Read more

    राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, 15 हजार 908 उमेदवार रिंगणात

    राज्यातील 29 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (ता. 15) मतदान होत असून त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत असून एकूण 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदारांकरिता एकूण 39 हजार 92 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक रिंगणात एकूण 15 हजार 908 इतके उमेदवार आहेत. तसेच पुरेशा पोलिस बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.

    Read more

    ठाकरे बंधूंच्या मराठी अजेंड्यावर सुजात आंबेडकर यांचा जोरदार प्रहार!!

    मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मराठीचा अजेंडा पुन्हा एकदा पुढे रेटला. पण मराठी भाषा आणि अस्मितेच्या नावावर राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंची युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पोलखोल केली.

    Read more

    5 फेब्रुवारी पर्यंत पवार काका – पुतण्यांची एकी; पण केंद्रीय मंत्रिपदासाठी सुप्रिया सुळे यांचे घोडे पुढे दामटले जाताच पुन्हा बेकी!!

    5 फेब्रुवारी पर्यंत पवार काका – पुतण्यांची एकी; पण केंद्रीय मंत्रिपदासाठी सुप्रिया सुळे यांचे घोडे पुढे दामटले जाताच पुन्हा बेकी!!, अशी दोन्ही राष्ट्रवादींची अवस्था होण्याची शक्यता आहे.

    Read more

    29 पैकी जास्तीत जास्त महापालिका जिंकून भाजप नंबर 1 वर राहील यात काय विशेष??; त्यापेक्षा भाजप ठाकरे, पवारांचे वर्चस्व कायमचे मोडणार का??, याला विशेष महत्त्व!!

    महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांपैकी जास्तीत जास्त महापालिका निवडणूक भाजप 1 नंबर वर राहील, यात काही विशेष नाही, त्यापेक्षा भाजप ठाकरे आणि पवारांचे वर्चस्व कायमचे मोडणार का??, या सवालाच्या उत्तराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

    Read more

    मुंबई महापालिकेकडे फक्त 140 PADU मशीन्स, वापरही अपवादात्मक; पण केवळ “पाडू” शब्दाला घाबरले ठाकरे!!

    नाशिक : मुंबई महापालिकेकडे फक्त 140 PADU मशीन्स आली आहेत त्यांचा वापरही केवळ अपवादात्मक होणार आहे पण फक्त “पाडू”, हा शब्द आल्याबरोबर ठाकरे बंधू घाबरले […]

    Read more

    Naresh Arora : अजित पवारांच्या सल्लागाराच्या कार्यालयात पोलिसांची धाड; पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केली भूमिका; तपासात आक्षेपार्ह आढळले नाही- पवार

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या ‘डिझाईन बॉक्स’ या कार्यालयात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात सुरुवातीला मोठी खळबळ उडाली होती. मात्र ही कोणतीही अधिकृत पोलिस कारवाई नसल्याचे स्पष्टीकरण पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे. पोलिसांच्या या पथकाकडून कार्यालयातील कागदपत्रांची केवळ प्राथमिक पाहणी केली जात असल्याची माहिती समोर येत असली तरी, नरेश अरोरा यांच्यावर कोणत्याही स्वरूपाची ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केल्याने या प्रकरणाबाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे.

    Read more

    १०० कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा भाजपवर आरोप करून अजितदादाच फसले; त्यावेळच्या अधिकाऱ्याने अजितदादांच्या भ्रष्टाचारी कळसाचे किस्से सांगितले!!

    शंभर कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा भाजपवर आरोप करून अजितदादाच फसले; त्या वेळच्या अधिकाऱ्याने अजितदादांच्या भ्रष्टाचारी कळसाचे किस्से बाहेर आणले.

    Read more

    Pavan Tripathi : पवन त्रिपाठी यांची टीका- ठाकरे बंधूंचे मराठी कार्ड फोल ठरणार; मुंबईचा महापौर ‘हिंदू आणि मराठीच’ होणार,

    मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मुंबई भाजपाचे महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी यांनी ठाकरे बंधूंच्या (उद्धव आणि राज ठाकरे) ‘मराठी कार्ड’वर जोरदार हल्ला चढवत भाजपाच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. “मुंबईचा महापौर हा केवळ मराठीच नाही, तर प्रखर हिंदूच असेल,” अशा शब्दांत त्रिपाठी यांनी विरोधकांना ललकारले आहे.

    Read more

    Ravindra Chavan : रवींद्र चव्हाणांचा ठाकरेंवर हल्लाबोल- सत्तेसाठी मराठी अस्मितेचा सोयीस्कर विसर; कॉंग्रेससह जाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या 105 हुतात्म्यांचा अपमान

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानावर गोळीबार करण्याचे पाप कॉंग्रेसचे आहे, हे इतिहासात नोंदलेले सत्य असूनही ठाकरे गट जाणीवपूर्वक त्याकडे डोळेझाक करत आहे, अशीह टीका चव्हाण यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

    Read more

    Zilla Parishad Election : झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा; 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला निकाल

    राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731, तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

    Read more

    Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले- राजकारणात एक्सपोर्ट-इम्पोर्ट वाढले; आयाराम-गयाराम संस्कृतीवर वार

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या खास मुलाखतीत सध्याच्या राजकीय प्रवाहांवर स्पष्ट आणि परखड भाष्य करत आयाराम-गयाराम संस्कृतीवर अचूक निशाणा साधला आहे. सध्या भाजपमध्ये सर्वाधिक पक्षप्रवेश होत असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गटासह विविध पक्षांतील नेते भाजपमध्ये दाखल होत असतानाच, गडकरींनी या ‘प्रवेश पर्वा’कडे उपरोधिक शैलीत पाहिले. सत्ता जिथे तिथे जा आणि सत्ता बदलली की पुन्हा दुसरीकडे वळा, हे राजकारणातलं एक्सपोर्ट-इम्पोर्ट वाढलं आहे, असे म्हणत त्यांनी या प्रवृत्तीबद्दल नाराजी व्यक्त केली. भाजप ‘राष्ट्रीय प्रवेश पार्टी’ ठरत असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

    Read more

    Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले- मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही, पण अजितदादांनी ते पाळले नाही

    महापालिका निवडणुकीला काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी खदखद व्यक्त केली आहे. मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही, पण अजित दादांनी ते पाळले नाही, असे फडणवीस म्हणाले. तसेच अजित दादांना दिल्लीत आमच्या वरिष्ठ नेत्यांना भेटायला जायचे असेल तर ते जाऊ शकतात. त्यांना विमान सुद्धा देण्याची व्यवस्था मी करेन, तिकीट सुद्धा काढून देईल. जोपर्यंत आमच्या वरिष्ठांना भेटतात तोपर्यंत मी आनंदी असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले.

    Read more